शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

दुष्काळप्रश्नी महिलांचे ५ तास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:53 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले. १५ दिवसांपूर्वी आंदोलन करुनही काम मिळत नसल्याने राज्य शेतमजूर युनियनने या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलन सुरू असताना तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. सायंकाळी साडे पाच वाजता १५ दिवसात काम उपलब्ध करुन देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.ग्रामीण भाग व शहरात मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, २०१६-१७ मध्ये नगरपालिकेंतर्गत काम केलेल्या मजुरांची मजुरी द्यावी, मजुरांना नमुना क्र. ५ ची पावती देण्यात यावी, अनेक मजूरांना जॉबकार्ड उपलब्ध करुन द्यावे, ग्रामीण भागातील कोथींबीरवाडी, हसनाबाद, रुई, मैंदवाडी, चोरांबा, अंजनडोह येथील ग्रामसेवक व बीडीओ कामाकडे दुर्लक्ष करून मजुरांना दडपशाही करीत असल्याने कार्यवाही करावी या मागण्यांसाठी धारुर तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सोपान भुंबे, कॉ. मनीषा करपे, कॉ. दत्ता डाके, कॉ. काशीराम सिरसट, कॉ. मीरा लांडगे, कॉ. वृंदावणी धोत्रे, शिवकन्या गोंदणे आदींनी केले.आंदोलनकर्ते राहिले ठामआंदोलनकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.सदरील अनुभव लक्षात घेत यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी तहसीलदार कार्यालयात होते. पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर चार वाजता त्यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून निवेदन स्वीकारले.मात्र, आंदोलनकर्ते लेखी आश्वासनावर ठाम होते. त्यामुळे पुन्हा दीड तास आंदोलनसुरुच होते.तहसीलदार पवार यांनी सायंकाळी साडेपाच वाजता लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळWomenमहिलाagitationआंदोलन