शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

नुकसान भरपाईपोटी १४४ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:32 IST

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून १४४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून १४४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतक-यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पेरणी झालेल्या ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रमुख्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मका, यासह इतर फळबाग केळी, पपई, मोसंबी यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून जलद गतिने करण्यात आले होते. यामध्ये महसूल, कृषी व जि.प. कर्मचा-यांचा समावेश आहे. नुकसानीचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी नुकसानभरपाईसाठी ५०१४ कोटी ८१ लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यानूसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १४४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच हा सर्व निधी तालुकास्तरावर वर्ग करण्यात आला असून हा निधी शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. दरम्यान शेतक-यांच्या खात्यावर नुकसानभरपाई निधी तात्काळ जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.अतिवृष्टी बाधित शेतक-यांना २ हेक्टरच्या सरासरी नुकसानभरपाई निधी मिळणार आहे. यामध्ये हेक्टरी ८ हजार रुपये तर फळबागांसाठी १८ हजार रुपये अशी नुकसानभरपाई रक्कम मिळणार आहे. मिळणारी ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून, सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.शेतक-यांना विमा तसेच वाढीव नुकसान भरपाई द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभरात रस्त्यावर उतरेल, असे देखील करपे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारRainपाऊस