शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

केजमध्ये शेतकऱ्यांचे २ तास झोपा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केज : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार ‘आमचंबी ठरलंय’ म्हणत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार ‘आमचंबी ठरलंय’ म्हणत पंधरा-वीस गावातील शेतक-यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर दोन तास झोपून आंदोलन केले.तालुक्यातील शेतक-यांच्या पशुधनाला दावणीला चारा-पाणी द्यावा, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पावसाअभावी वाळलेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, खरीप २०१७ तसेच २रबी २०१८ चा विमा शेतक-यांना द्यावा, २०१९ चा खरीप विमा जाहीर करून तोही तात्काळ वाटप करावा, टंचाई परिस्थितीवर तत्काळ उपाय करावेत, शेतकरी सन्मान योजनेची पूर्ण रक्कम शेतक-यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावी, पीक कर्जासाठी शेतक-यांची पिळवणूक थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी पंधरा-वीस गावातील शेतकरीआंदोलनात सहभागी झाले होते. यापूर्वी याच आंदोलकांनी दोन सप्टेंबर रोजी कुंबेफळ येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.शेतकरी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यासाठी गेले असता उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी निवेदन स्वीकारत या प्रश्नी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी