शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्यात एनएचएमच्या माध्यमातून ३०० शेततळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:02 IST

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गंत फळबाग लागवडीला चालना मिळावी, यासाठी शंभर टक्के अनुदान असणाऱ्या ३०० शेततळ््यांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्हाभरातील शेतकºयांना या योजनेचा लाभ सोडत पद्धतीने दिला जाणार आहे.

ठळक मुद्देकृषी विभाग : फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शंभर टक्के अनुदान; सोडत पद्धतीने मिळणार लाभ

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गंत फळबाग लागवडीला चालना मिळावी, यासाठी शंभर टक्के अनुदान असणाऱ्या ३०० शेततळ््यांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्हाभरातील शेतकºयांना या योजनेचा लाभ सोडत पद्धतीने दिला जाणार आहे.बीड जिल्ह्यात कापूस, सोयबीन, पाऊस चांगला झाला तर ऊस या नगदी पिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वेळा उत्पादनापेक्षा खर्च जास्त होतो व शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी शेततळे हा एक उत्तम पर्याय शेतकºयांपुढे आहे. त्यामुळेच शासनाच्या वतीने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवलेली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात जवळपास ६ हजार शेततळ््यांची निर्मिती करण्यात आली आहे.फळबाग लागवडीला चालना मिळावी व शेतकºयांना पाणी साठवण्यासाठी एक शाश्वत स्त्रोत निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत जिल्हाभरात ३०० शेततळी तयार केली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी अर्ज केले होते. या अर्जांची पडताळणी व आॅनलाईन पद्धतीने सोडत करुन २९८ जणांना या योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा कृषी उपसंचालक सी. डी. पाटील यांनी दिली....बीड जिल्ह्यातील मृदेचा कस लक्षात घेतला तर असे लक्षात येते की, विविध फळबागांची लागवड होऊ शकते. मात्र, पाण्याचा प्रश्न असल्यामुळे शेतकरी फळबाग लावण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे या योजनेमधून पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण केला जाणार आहे. पाण्याचे प्रमाण वाढले तर पिकांचे नियोजन करता येते, तसेच पारंपारिक पिकांसोबत, फळबाग लागवड देखील करता येऊ शक ते.- एम. एल. चपळे, जिल्हा कृषी अधीक्षक बीड

टॅग्स :BeedबीडWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र