शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

बीड जिल्ह्यात अडीच महिन्यांत ३० शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:42 AM

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना यामध्ये यश आले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देआत्महत्या रोखण्यात शासन-प्रशासनाला अपयश

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना यामध्ये यश आले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा, लोकसभेत बीड जिल्ह्यातील आत्महत्यांचा विषय गाजला होता. त्यानंतर शासनाकडून आत्महत्याग्रस्त जिल्हा बीडची घोषणा करण्यात आली. तसेच आत्महत्या रोखण्यासठी स्थानिक पातळीवर विविध योजना राबवल्या गेल्या. जनजागृती अभियान राबवले गेले. परंतु याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. शासन, नाम फाऊंडेशन व इतर संस्थांकडून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत देखील केली गेली.

शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणी मात्र अजून केली गेली नाही. त्यामध्येच नगदी पीक असलेल्या कापसावर बोंडअळीने हल्ला केला. त्यामुळे उत्पादनात घट झाली. तसेच कापसाला भावही चांगला न मिळाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला. कापसाला योग्य भाव नसल्यामुळे आज देखील जिल्ह्यात ६० टक्क्यांवर कापूस शेतकºयांडेच आहे. अनेक ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रांवर तूर उत्पादक शेतकºयांची अडवणूक करण्यात आली. तसेच शेतात काम करणाºयांची मजुरी वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.कर्जमाफीच्या अंमलबजावणीची मागणीशासनाने कर्जमाफीची घोषणा केली त्याची अंमलबजावणी त्वरीत करावी, बोंडअळीमुळे झालेली नुकसानभरपाई सरसकट द्यावी, तूर, कापसाला हमी भाव द्या, अशी मागणी शेतकरी नितीन खंडागळे, अशोक खंडागळे यांनी केली आहे.