शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मादळमोहीमध्ये पाण्यातून २६ शेळ्यांना विषबाधा; १२ मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 11:39 PM

पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही १४ शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही १४ शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.मादळमोही भागवत सीताराम गावडे यांच्याकडे २६ शेळ्या आहेत. मंगळवारी त्यांनी या शेळ्या चारण्यासाठी शेतात नेल्या होत्या. दरम्यान सायंकाळी ४ वा. शेतातून शेळ्या परत आणून गावडे यांच्या गावालगत असलेल्या वाड्यात बांधल्या. मात्र यानंतर अचानक शेळ्यांना चकरा येण्यास सुरूवात झाली. यावेळी गावडे यांनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉ.मोहोळकर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ शेळ्यांवर उपचार सुरू केले. मात्र काही ठराविक वेळाने यामधील १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. अजूनही काही शेळ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान यामध्ये भागवत गावडे यांचे जवळपास १ लाख २० हजारांचे नुकसान झाले असून, तलाठ्यांनी पंचनामा करुन वरिष्ठांकडे तसा अहवाल पाठवला आहे. दिवाळीच्या पूर्वसंधेला घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने सदरील शेतकºयास मदत करण्याची मागणी होत आहे.पाण्यातून विषबाधा ?गावडे यांनी दिवसभर शेळ्या शेतशिवारात चारल्या. या शेळ्यांनी शेतात एका ठिकाणी साठवलेले पाणी पिलेले असल्याने यामधूनच ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचे पीएम करण्यात आले असून, तो आल्यानंतरच शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे कारण स्पष्ट होईल.मदतीला धावली रासपाया घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांनी तात्काळ मादळमोही येथे जाऊन शेतकºयाच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी गावडे यांना धीर देत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ३० हजार रुपये मदतीची घोषणा केली. तसेच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या माध्यमातून मेशपाल योजनेतून १ लाख निधी मंजूर करु न देण्याचे देखील आश्वासन यावेळी परमेश्वर वाघमोडे यांनी दिले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रwater pollutionजल प्रदूषण