शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रेंगाळलेल्या २०० जलकुंभ शुद्धीकरणाला येऊ लागला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:32 IST

पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पावसाळा सुरु झाल्याने जलकुंभांच्या जलशुद्धीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुरु झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पावसाळा सुरु झाल्याने जलकुंभांच्या जलशुद्धीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुरु झाले आहे. या अभियानांतर्गत काही ठिकाणी तातडीने कामे सुरु झाली होती. लोकमतने याबाबत सविस्तर वृत्त दिल्यानंतर जिल्ह्यातील चार तालुक्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली, त्याचबरोबर त्या त्या तालुक्यातील जलकुंभाचे शुध्दीकरण करण्यास सुरु वात झाली.पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत वर्षभरात दोन वेळा पावसाळ्याआधी व नंतर शुद्धीकरण केले जाते. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षित हाताळणी व साठवणुकीसाठी ही मोहीम महत्वाची असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील ७५० जलकुंभांचे शुद्धीकरण हाती घेण्यात आले होते. या संदर्भात ७ जुलै रोजी लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. इतर ठिकाणी कामे सुरु झाल्याचे समजल्याने ज्या तालुक्यात ही मोहीम सुरु झाली नव्हती, त्या तालुक्यातील यंत्रणा जागी झाली. विस्तार अधिकारी आरोग्य, एमपीडब्ल्यू, पाणी गुणवत्ता विभागाचे कर्मचाऱ्यांनी धावपळ सुरु केली. ३०० जलरक्षक व ३०० आरोग्य कर्मचारी आदींनी जलकुंभ शुध्दीकरण हाती घेतले. जिल्ह्यातील शिरुर कासार, पाटोदा, आष्टी, माजलगाव तालुक्यात ही कामे सुरु झाली दोन दिवसात जवळपास २०० जलकुंभांचे शुद्धीकरण करण्यात आले. यात क्लोरिनचा वापर करण्यात आला. आधी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ब्लिचिंग पावडरचा पुरवठा होत होता. काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना स्वत:च्या उत्पन्नातून ब्लिचिंग पावडर विकत घ्यावी लागते. रविवारी ‘लोकमत’ मधील वृत्तानंतर ग्रामपंचायतींनीही तातडीने ब्लिचिंग पावडर खरेदी केली. बंद जलकुंभाचे शुद्धीकरण झाले.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य