शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

१७ दिवसांच्या जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू; बीडमधील घटनेत घातपाताचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:38 IST

दोघींचाही एकाचवेळी मृत्यू होणे, हे संशयास्पद आहे.

बीड/गेवराई : ताप आल्याने १७ दिवसांच्या जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाला. ही घटना १३ मार्च रोजी घडली होती. परंतु हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने आरोग्य, पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर बरोबर एका महिन्यानंतर म्हणजेच १३ एप्रिल रोजी हे दोन्ही मृतदेह बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.  या जुळ्या मुलींचा मृत्यू नेमका ताप आल्याने झाला की त्यांचा घातपात झाला? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

गेवराई तालुक्यातील निपानी जवळका येथील अनिता कुंडलिक चव्हाण (२९) ही महिला गर्भवती असल्याने काठोडा तांडा येथे माहेरी आली होती. कळा येऊ लागल्याने तिला २५ फेब्रवारीला दुपारी १२ वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. रात्री ८.२० वाजता तिला शस्त्रक्रीया विभागात घेतले. यामध्ये तिचे सिझेरिअन झाले आणि तिने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. आईची प्रकृती स्थिर होती मात्र दोन्ही मुलींचे वजन कमी असल्याने त्यांना एसएनसीयू विभागात दाखल केले. ३ एप्रिल रोजी अनिताला जिल्हा रूग्णालयातून सुट्टी झाली होती.

दरम्यान, आशा कार्यकर्तीने गावात जावून पाहणी केल्यानंतर अनिताच्या दोन्ही मुलींचे वजन आणखी कमी झाल्याचे दिसले. तिने रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर १२ एप्रिलच्या मध्यरात्री या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. त्या दोघींनाही जवळच एक खड्डा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीच बाब काही दिवसांनी ताालुका आरोग्य अधिकाऱ्यांना समजली. त्यांनी याची चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यावर याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची विनंती केली. त्यांनी तलवाडा पोलीस ठाण्याला पत्र पाठविले. तलवाड्याचे सपोनि मारोती मुंडे यांच्या खबरीवरून यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.

शनिवारी दुपारी तहसीलदार संगिता चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कदम, डॉ.गुट्टे, सपोनि मारोती मुंडे, पोउपनि रघुविर मुºहाडे यांच्यासमक्ष हे दोन्ही मृतदेह तब्बल महिन्यानंतर बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी ते मृतदेह सायंकाळी जिल्हा रूग्णालयात आणले होते.

घातपाताचा संशयअनिता यांना या अगोदर दोन्ही मुलीच आहेत. त्यानंतर पुन्हा त्यांना दोन जुळ्या मुलीच झाल्या. त्यामुळे त्या नैराश्यात होत्या. पोलिसांना दिलेल्या जबाबात अनिता यांनी दोन्ही मुलींचा ताप आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र ताप आली तरी दोघींचाही एकाचवेळी मृत्यू होणे, हे संशयास्पद आहे. त्यामुळे यात घातपाताचाही संशय असू शकतो. शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल, असे सपोनि मारोती मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसFamilyपरिवार