शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

जागतिक 'हृदय दिवस' विशेष !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 11:24 IST

भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेला हृदयरोग याबाबत बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे मुख्य कारण होऊ पाहत आहे....

-रवींद्र मोरे भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेला हृदयरोग याबाबत बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे मुख्य कारण होऊ पाहत आहे. तज्ज्ञांचे मते आजच्या तरुणाईनेही हृदयरोगाविषयी विशेष खबरदारी घेतली पाहिजे. या आजाराविषयी जनजागृतीसाठी दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदयरोग दिवस साजरा केला जातो. याबाबत सीएनएक्सने घेतलेला आढावा. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या रिपोर्टनुसार २०२० पर्यंत भारतात होणारे मृत्यु आणि अपंगत्वाला सर्वात मोठे कारण म्हणजे हृदयरोग होय. बीएलके सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल मधील हृदय केंद्राचे वरिष्ठ सल्लागार आणि निदेशक नीरज भल्ला यांच्या मते, हृदयरोग पिडीत व्यक्तिचे दिवसेंदिवस आयुष्य कमी होत चालले आहे. वयाच्या २० व्या वर्षीच बरेच लोक  हृदयरोगाने ग्रस्त होत आहेत. पुढील पाच ते दहा वर्षात एकुण भारतीय लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के भाग हा हृदयरोगाने त्रस्त असेल, असेही ते म्हणाले. तज्ज्ञांच्या मते आजची तरुणाई नोकरी किंवा व्यवसायात अनियमित तासिकात काम करते. याच कारणाने त्यांच्यात ताणतणाव वाढतो आणि विशेष म्हणजे बºयाचजणांना घरचा स्वयंपाकदेखील मिळत नाही. याच कारणाने जास्तीचा ताण वाढतो आणि व्यसनाच्या आहारी म्हणजेच धूम्रपान आणि मद्यपानास सुरुवात होते. याप्रकारच्या जीवनशैलीमुळे रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेहसारखे आजार बळावतात आणि याचे रुपांतर हृदयरोगात होते. हृदयरोगापासून मुक्ततेसाठी सर्वप्रथम तरुणाईत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी तरुणाईनेही पुढाकार घेत  व्यायाम करणे, जंक फूड आणि तळलेले पदार्थ तसेच धूम्रपानापासून स्वत:ला लांब ठेवत हृदयरोगापासून स्वत:ला वाचविले पाहिजे.  विशेषत: पालेभाज्या, मासे, फळे आणि कडधान्ये यांचा समावेश असलेल्या सकस आहाराचे सेवन केले पाहिजे. यामुळे हृदयरुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी होत असल्याचा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे.सकस आहार हा जगभरात आरोग्यासाठी लाभदायक आहार असल्याचे इटलीतील आयआरसीसीएस न्यूरोम संस्थेच्या गिओव्हॅनी दे गायेतानो यांनी सांगितले. या आहारामुळे विविध आजारांचा धोका कमी होतो, त्यामुळेच प्रत्येकालाच असा सकस आहार देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे हृदयरोग असलेल्यांना हा आहार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब हा आजार असलेल्यांना सकस आहार दिल्यास त्यांना असलेला जिवाचा धोका २१ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले. कमी सकस आहार घेणाºयांना जिवाचा धोका अधिक असल्याचेही निरीक्षण नोंदविले गेले आहे.पालेभाज्या, मासे, फळे, कडधान्ये यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील घातक आम्ल नष्ट होऊन रुग्णांना त्याचा लाभ होत असल्याचे संशोधक मारिआलॉरा बोनॅसिओ यांनी सांगितले. हृदयाच्या काळजीसाठी हे करा...* थोडा वेळ व्यायामासाठी काढा* दर दिवशी कमीतकमी अर्धातास व्यायाम करणे हृदयासाठी फायदेशीर आहे. * वेळेचा अभाव असेल तर आपण चालू शकता.* प्रकृतीनुसार आहार घ्या* मीठाचे कमी प्रमाणात सेवन करा. * ताजे फळे आणि भाजीपाला खावेत. * नास्ता आणि जेवण वेळेवर करा. * तंबाकूपासून लांब रहा.* कित्येक तास एकाच स्थितीत बसणे हृदयासाठी अपायकारक ठरु  शकते. * आयुष्यात येणाºया ताणतणावाला चारहात लांब ठेवा.