शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मिठाच्या पाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, महागड्या प्रॉडक्ट्सना कराल बाय-बाय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 09:20 IST

त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी मिठानेही तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

(Image Credit : Social Media)

मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण या नैसर्गिक मिनरलचे आरोग्यासाठी अनेक फायदेही होतात. ब्लड शुगर नियंत्रित करणे, वजन कमी करणे इत्यादीसाठी मीठ फायदेशीर आहे. इतकेच नाही तर मीठ आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतं. मिठाच्या पाण्यात मिनरल्स जसे की, कॅल्शिअम, सिलिकॉन, सोडिअम इत्यादी आढळतात. त्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी महागड्या उत्पादनांचा वापर करणं गरजेचं नाही. चला जाणून घेऊ मिठाच्या पाण्याचा वापर... 

पिंपल्सने हैराण असाल तर...

(Image Credit : herzindagi.com)

मिठाच्या पाण्यात असलेली हीलिंग प्रॉपर्टीज त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही सतत येणाऱ्या पिंपल्सने हैराण असाल तर एक कप पाण्यात एक चमचा मीठ मिश्रित करा. हे पाणी रूईच्या मदतीने प्रभावित भागांवर लावा आणि कोरडं होऊ द्या. नंतर चेहरा पाण्याने धुवावा. 

त्वचा एक्सफोलिएट करतं

(Image Credit : boldsky.com)

त्वचेवरून मृत पेशी दूर करण्यासाठी एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. मिठाच्या रफ टेक्चरमुळे त्वचा चांगल्याप्रकारे एक्सफोलिएट करण्यास मदत मिळते. मीठ आणि त्यात थोडं पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करा. मिठाचं प्रमाण अधिक ठेवा. या पेस्टने त्वचेवर हळूहळू मसाज करा. 

त्वचेची सुरक्षा

(Image Credit : drjohnfagbemi.co.uk)

मिठात अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचा कापली गेल्यावर ठीक करण्यास याने मदत होते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावरील सर्व बॅक्टेरिया मारण्यास मदत मिळते. सोबतच त्वचेवरील सगळे घावही भरले जातात.

तजेलदार त्वचेसाठी मिठाच्या पाण्याचं सेवन

(Image Credit : beautyglimpse.com)

तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी केवळ बाहेरील पोषण नाही तर आतूनही पोषण गरजेचं असतं. त्यासाठी रोज कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिश्रित करून सेवन करा. याने शरीराला डिटॉक्सीफाय होण्यास मदत मिळते आणि सूजही कमी होते. सोबतच त्वचा तजेलदार होते.

पाय स्वच्छ करण्यासाठी

(Image Credit : healthyliving.azcentral.com)

मिठाच्या पाण्याने पाय स्वच्छ केले तर याने थकवा दूर होतो. पायांवरून मृत पेशींना दूर करण्यासाठी मिठाचं पाणी फायदेशीर ठरतं. कोमट पाण्यात मीठ टाका आणि त्यात थोडा वेळ पाय ठेवा. नंतर स्क्रब करा. याने पाय चांगले स्वच्छही होतील आणि थकवाही दूर होईल.

(टिप : वरील लेखातील सल्ले आणि उपाय हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काही लोकांना हे उपाय सगळ्यांना सूट करतील असं नाही. काहींना यामुळे समस्याही होऊ शकतात. कारण प्रत्येकाची त्वचा वेगवेग्या प्रकारची असते.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स