शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मिठाच्या पाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, महागड्या प्रॉडक्ट्सना कराल बाय-बाय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 09:20 IST

त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी मिठानेही तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

(Image Credit : Social Media)

मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण या नैसर्गिक मिनरलचे आरोग्यासाठी अनेक फायदेही होतात. ब्लड शुगर नियंत्रित करणे, वजन कमी करणे इत्यादीसाठी मीठ फायदेशीर आहे. इतकेच नाही तर मीठ आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतं. मिठाच्या पाण्यात मिनरल्स जसे की, कॅल्शिअम, सिलिकॉन, सोडिअम इत्यादी आढळतात. त्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी महागड्या उत्पादनांचा वापर करणं गरजेचं नाही. चला जाणून घेऊ मिठाच्या पाण्याचा वापर... 

पिंपल्सने हैराण असाल तर...

(Image Credit : herzindagi.com)

मिठाच्या पाण्यात असलेली हीलिंग प्रॉपर्टीज त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही सतत येणाऱ्या पिंपल्सने हैराण असाल तर एक कप पाण्यात एक चमचा मीठ मिश्रित करा. हे पाणी रूईच्या मदतीने प्रभावित भागांवर लावा आणि कोरडं होऊ द्या. नंतर चेहरा पाण्याने धुवावा. 

त्वचा एक्सफोलिएट करतं

(Image Credit : boldsky.com)

त्वचेवरून मृत पेशी दूर करण्यासाठी एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. मिठाच्या रफ टेक्चरमुळे त्वचा चांगल्याप्रकारे एक्सफोलिएट करण्यास मदत मिळते. मीठ आणि त्यात थोडं पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करा. मिठाचं प्रमाण अधिक ठेवा. या पेस्टने त्वचेवर हळूहळू मसाज करा. 

त्वचेची सुरक्षा

(Image Credit : drjohnfagbemi.co.uk)

मिठात अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचा कापली गेल्यावर ठीक करण्यास याने मदत होते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावरील सर्व बॅक्टेरिया मारण्यास मदत मिळते. सोबतच त्वचेवरील सगळे घावही भरले जातात.

तजेलदार त्वचेसाठी मिठाच्या पाण्याचं सेवन

(Image Credit : beautyglimpse.com)

तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी केवळ बाहेरील पोषण नाही तर आतूनही पोषण गरजेचं असतं. त्यासाठी रोज कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिश्रित करून सेवन करा. याने शरीराला डिटॉक्सीफाय होण्यास मदत मिळते आणि सूजही कमी होते. सोबतच त्वचा तजेलदार होते.

पाय स्वच्छ करण्यासाठी

(Image Credit : healthyliving.azcentral.com)

मिठाच्या पाण्याने पाय स्वच्छ केले तर याने थकवा दूर होतो. पायांवरून मृत पेशींना दूर करण्यासाठी मिठाचं पाणी फायदेशीर ठरतं. कोमट पाण्यात मीठ टाका आणि त्यात थोडा वेळ पाय ठेवा. नंतर स्क्रब करा. याने पाय चांगले स्वच्छही होतील आणि थकवाही दूर होईल.

(टिप : वरील लेखातील सल्ले आणि उपाय हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काही लोकांना हे उपाय सगळ्यांना सूट करतील असं नाही. काहींना यामुळे समस्याही होऊ शकतात. कारण प्रत्येकाची त्वचा वेगवेग्या प्रकारची असते.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स