शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

तुम्ही थंडीच्या भीतीने हिवाळ्यात आंघोळ करत नाही का? मग हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 11:51 IST

थंडीच्या भीतीमुळे अनेकजण आठवड्यातून केवळ ३ ते ४ दिवसच आंघोळ करतात. इतकेच नाही तर काही लोक इतके घाणेरडे असतात की, आठवड्यातून केवळ एकच दिवस आंघोळ करतात.

हिवाळा आता सगळीकडे चांगलाच जाणवू लागला आहे. या बदलत्या वातावरणामुळे त्वचेची आणि आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. या दिवसात त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अनेकजण तर थंडीमुळे आंघोळ करण्यासही नकार देतात. 

थंडीच्या भीतीमुळे अनेकजण आठवड्यातून केवळ ३ ते ४ दिवसच आंघोळ करतात. इतकेच नाही तर काही लोक इतके घाणेरडे असतात की, आठवड्यातून केवळ एकच दिवस आंघोळ करतात. पण हे चुकीचं आहे. कितीही थंडी असली तरी आंघोळ ही गरजेची आहे. कारण दिवसभर आपल्या शरीरावर धूळ-माती चिकटलेली असते. ही धूळ त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये अडकून राहते. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त उष्णता आणि विषारी तत्व शरीरातून बाहेर येऊ शकत नाहीत. 

रोज आंघोळ का गरजेची?

शरीरात सतत होणाऱ्या प्रक्रियांमुळे वेगवेगळे द्रव्य शरीराच्या बाहेर टाकले जातात. यातील काही मलमूत्रांव्दारे बाहेर निघतात आणि काही घामाच्या माध्यमातून बाहेर येतात. अशात जर तुम्ही त्वचेची स्वच्छता केली नाही तर रोमछिद्रे धुळीने बुजलेली असलेल्या कारणाने घाम शरीरातून बाहेर येऊ शकत नाही. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वातावरण कोणतही असो आंघोळ ही गरजेची आहे. 

थंडीमध्ये आंघोळ

नेहमी थंड पाण्याने आंघोळ करणे फायदे ठरते. तसे तर उन्हाळ्यात अनेकजण थंड पाण्याने एकदा नाही तर दोन-तीनदा आंघोळ करतात. पण थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण याने शरीराला नुकसान होतं. पाणी फारच थंड असेल तर कोमट पाण्याने आंघोळ केली तरी चालेल. 

सर्दी असताना आंघोळ

जर तुम्हाला पाणी फार जास्त थंड वाटत असेल आणि तुम्हाला सर्दी झालेली असेल तर पाणी थोडं कोमट करा. पण रोज थंड पाण्याने आंघोळ करण्याचीच सवय असायला हवी. रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची बाहेरील त्वचेत होणारा रक्तप्रवाह प्रभावित होतो आणि हळूहळू हा प्रवाह कमी होत जातो. सोबतच बाहेरील त्वचेवर असलेल्या रक्तपेशी कमजोर होऊ लागतात. 

सामान्य पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

सामान्य पाण्याने आंघोळ केल्याने रक्तपेशी मजबूत होतात. आपल्या शरीराची बाहेरील त्वचा जेव्हा थंड पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा ती स्वाभाविकपणे आकुंचन पावते. याने त्वचेला आराम मिळतो. सामान्य किंवा थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह स्वाभाविक राहतो आणि शारीरिक क्षमतेत वाढ होते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स