शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

तुम्ही थंडीच्या भीतीने हिवाळ्यात आंघोळ करत नाही का? मग हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 11:51 IST

थंडीच्या भीतीमुळे अनेकजण आठवड्यातून केवळ ३ ते ४ दिवसच आंघोळ करतात. इतकेच नाही तर काही लोक इतके घाणेरडे असतात की, आठवड्यातून केवळ एकच दिवस आंघोळ करतात.

हिवाळा आता सगळीकडे चांगलाच जाणवू लागला आहे. या बदलत्या वातावरणामुळे त्वचेची आणि आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. या दिवसात त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अनेकजण तर थंडीमुळे आंघोळ करण्यासही नकार देतात. 

थंडीच्या भीतीमुळे अनेकजण आठवड्यातून केवळ ३ ते ४ दिवसच आंघोळ करतात. इतकेच नाही तर काही लोक इतके घाणेरडे असतात की, आठवड्यातून केवळ एकच दिवस आंघोळ करतात. पण हे चुकीचं आहे. कितीही थंडी असली तरी आंघोळ ही गरजेची आहे. कारण दिवसभर आपल्या शरीरावर धूळ-माती चिकटलेली असते. ही धूळ त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये अडकून राहते. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त उष्णता आणि विषारी तत्व शरीरातून बाहेर येऊ शकत नाहीत. 

रोज आंघोळ का गरजेची?

शरीरात सतत होणाऱ्या प्रक्रियांमुळे वेगवेगळे द्रव्य शरीराच्या बाहेर टाकले जातात. यातील काही मलमूत्रांव्दारे बाहेर निघतात आणि काही घामाच्या माध्यमातून बाहेर येतात. अशात जर तुम्ही त्वचेची स्वच्छता केली नाही तर रोमछिद्रे धुळीने बुजलेली असलेल्या कारणाने घाम शरीरातून बाहेर येऊ शकत नाही. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वातावरण कोणतही असो आंघोळ ही गरजेची आहे. 

थंडीमध्ये आंघोळ

नेहमी थंड पाण्याने आंघोळ करणे फायदे ठरते. तसे तर उन्हाळ्यात अनेकजण थंड पाण्याने एकदा नाही तर दोन-तीनदा आंघोळ करतात. पण थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण याने शरीराला नुकसान होतं. पाणी फारच थंड असेल तर कोमट पाण्याने आंघोळ केली तरी चालेल. 

सर्दी असताना आंघोळ

जर तुम्हाला पाणी फार जास्त थंड वाटत असेल आणि तुम्हाला सर्दी झालेली असेल तर पाणी थोडं कोमट करा. पण रोज थंड पाण्याने आंघोळ करण्याचीच सवय असायला हवी. रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची बाहेरील त्वचेत होणारा रक्तप्रवाह प्रभावित होतो आणि हळूहळू हा प्रवाह कमी होत जातो. सोबतच बाहेरील त्वचेवर असलेल्या रक्तपेशी कमजोर होऊ लागतात. 

सामान्य पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

सामान्य पाण्याने आंघोळ केल्याने रक्तपेशी मजबूत होतात. आपल्या शरीराची बाहेरील त्वचा जेव्हा थंड पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा ती स्वाभाविकपणे आकुंचन पावते. याने त्वचेला आराम मिळतो. सामान्य किंवा थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह स्वाभाविक राहतो आणि शारीरिक क्षमतेत वाढ होते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स