शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
4
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
5
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
6
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
7
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
8
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
9
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
10
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
11
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
12
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
13
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
14
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
15
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
16
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
17
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
18
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
19
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
20
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही थंडीच्या भीतीने हिवाळ्यात आंघोळ करत नाही का? मग हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 11:51 IST

थंडीच्या भीतीमुळे अनेकजण आठवड्यातून केवळ ३ ते ४ दिवसच आंघोळ करतात. इतकेच नाही तर काही लोक इतके घाणेरडे असतात की, आठवड्यातून केवळ एकच दिवस आंघोळ करतात.

हिवाळा आता सगळीकडे चांगलाच जाणवू लागला आहे. या बदलत्या वातावरणामुळे त्वचेची आणि आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. या दिवसात त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अनेकजण तर थंडीमुळे आंघोळ करण्यासही नकार देतात. 

थंडीच्या भीतीमुळे अनेकजण आठवड्यातून केवळ ३ ते ४ दिवसच आंघोळ करतात. इतकेच नाही तर काही लोक इतके घाणेरडे असतात की, आठवड्यातून केवळ एकच दिवस आंघोळ करतात. पण हे चुकीचं आहे. कितीही थंडी असली तरी आंघोळ ही गरजेची आहे. कारण दिवसभर आपल्या शरीरावर धूळ-माती चिकटलेली असते. ही धूळ त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये अडकून राहते. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त उष्णता आणि विषारी तत्व शरीरातून बाहेर येऊ शकत नाहीत. 

रोज आंघोळ का गरजेची?

शरीरात सतत होणाऱ्या प्रक्रियांमुळे वेगवेगळे द्रव्य शरीराच्या बाहेर टाकले जातात. यातील काही मलमूत्रांव्दारे बाहेर निघतात आणि काही घामाच्या माध्यमातून बाहेर येतात. अशात जर तुम्ही त्वचेची स्वच्छता केली नाही तर रोमछिद्रे धुळीने बुजलेली असलेल्या कारणाने घाम शरीरातून बाहेर येऊ शकत नाही. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वातावरण कोणतही असो आंघोळ ही गरजेची आहे. 

थंडीमध्ये आंघोळ

नेहमी थंड पाण्याने आंघोळ करणे फायदे ठरते. तसे तर उन्हाळ्यात अनेकजण थंड पाण्याने एकदा नाही तर दोन-तीनदा आंघोळ करतात. पण थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण याने शरीराला नुकसान होतं. पाणी फारच थंड असेल तर कोमट पाण्याने आंघोळ केली तरी चालेल. 

सर्दी असताना आंघोळ

जर तुम्हाला पाणी फार जास्त थंड वाटत असेल आणि तुम्हाला सर्दी झालेली असेल तर पाणी थोडं कोमट करा. पण रोज थंड पाण्याने आंघोळ करण्याचीच सवय असायला हवी. रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची बाहेरील त्वचेत होणारा रक्तप्रवाह प्रभावित होतो आणि हळूहळू हा प्रवाह कमी होत जातो. सोबतच बाहेरील त्वचेवर असलेल्या रक्तपेशी कमजोर होऊ लागतात. 

सामान्य पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

सामान्य पाण्याने आंघोळ केल्याने रक्तपेशी मजबूत होतात. आपल्या शरीराची बाहेरील त्वचा जेव्हा थंड पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा ती स्वाभाविकपणे आकुंचन पावते. याने त्वचेला आराम मिळतो. सामान्य किंवा थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह स्वाभाविक राहतो आणि शारीरिक क्षमतेत वाढ होते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स