शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

​देशात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 14:01 IST

भारतात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू होतो.

‘दारूबंदी’ची मागणी जोर पकडत असतानाच दारूमुळे मृत्यू होण्यासंबंधीचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. भारतात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू होतो. याचा अर्थ की, दररोज 15 लोक दारूच्या व्यसनापायी आपले आयु्ष्य गमावतात.इंडियास्पेंड संस्थेने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2013 सालच्या रिपोर्टचे विश्लेषण करून हे विदारक सत्य बाहेर आणले.दारुमुळे मृत्यू होण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यानंतर मध्यप्रदेश आणि तमिळनाडूचा क्रमांक येतो. तज्ज्ञांच्या मते, दारूचे अतिसेवनामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते.बहुतांश गुन्हे आणि अपघात हे दारूमुळे होतात. महिलांचा लैंगिक छळ आणि चोरी यांसारख्या गुन्ह्यांचा संबंध दारूशी असल्याची माहिती एस. राजू यांनी दिली.गेल्या काही वर्षांमध्ये दारूचे दरडोई सेवनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार 2003-05 मध्ये दारूचे दरडोई सेवन 1.6 लिटर होते ते 38 टक्क्यांनी वाढून 2010-12 मध्ये 2.2 लिटर झाले.सुमोर ११ टक्के भारतीय हे बिंज ड्रिंकर (एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दारू पिणारे) आहेत. जागतिक लोकसंख्येचा विचार करता हेच प्रमाण 16 टक्के आहे.अलिकडच्या काळामध्ये राजकीय इच्छाशक्ती व प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी दारूबंदीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. तमिळनाडूमध्ये जयललितांनी निवडूण आल्यावर पहिल्याच दिवशी 500 दारूची दुकाने बंद केली. एप्रिल महिन्यात बिहारमध्ये नितीशकुमारांनी दारु विक्री, सेवन आणि उत्पादनावर बंदी घातली.तिकेड केरळमध्येदेखील 2014 साली पंचतारांकित हॉटेल्स वगळता इतर सर्व ठिकाणी दारुबंदी लागू केली.  दारुबंदीला समर्थन करण्यामध्ये महिला आघाडीवर आहेत. तमिळनाडूमध्ये 47 टक्के तर केरळमध्ये 52 महिलांनी दारूबंदीच्या निर्णय योग्य असल्याचे सांगितले.