शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सायना पुन्हा सलामीला पराभूत, समीरलाही धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 04:15 IST

सायना नेहवाल आणि समीर वर्मा या भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान हाँगकाँग ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत संपुष्टात आलेले.

हाँगकाँग: सायना नेहवाल आणि समीर वर्मा या भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान हाँगकाँग ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत संपुष्टात आलेले. बुधवारी आठव्या मानांकित सायनाला चीनच्या कै यान यान हिने १३-२१, २०-२२ अशा दोन गेममध्ये पराभूत केले. आठवी मानांकित सायना गेल्या सहा स्पर्धांमध्ये पाचवेळा पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली आहे.सायनाने चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा निभाव लागला नाही. दुसऱ्या गेममध्ये सायनाने विजयाच्या प्रयत्नांत बराच घाम गाळला पण तिचे प्रयत्न तोकडे पडले. पुरुषांमध्ये १६ वा मानांकित समीर वर्मा याचे आव्हान चायनीज तैपईच्या वँग त्झू वईने अवघ्या ५४ मिनिटात परतवून लावले. पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागण्याची समीरची ही तिसरी वेळ ठरली. समीर प्रतिस्पर्धी खेळाडूच्या आव्हानाचा सामना करु शकला नाही.दुसरीकडे गेल्या काही स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाहेर झालेली जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील सिंधू ३६ मिनिटात विजयी झाली. जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी असलेली कोरियाच्या किम गा यून हिच्यावर तिने २१-१५, २१-१६ असा विजय साजरा केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये १३-१३ अशी बरोबरी झाल्यानंतर सलग सहा गुणांची कमाई करीत सहजपणे गेम जिंकला. दुसºया गेममध्ये सुरुवातीला ५-५ अशी बरोबरी होती, पण सलग सात गुणांची कमाई करीत सिंधूने आघाडी मिळविताच तिला गेम आणि सामना जिंकण्यात अडचण जाणवली नाही. आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूला आता थायलंडची बुसानन ओंगबामरूनगफान हिच्याविरुद्ध खेळावे लागेल.पुरुष एकेरीमध्ये एच. एस. प्रणॉय हादेखील पहिला अडथळा पार करण्यात यशस्वी ठरला. त्याने चीनचा हुआंग यू शियांग याच्यावर ४४ मिनिटांच्या खेळात २१-१७, २१-१७ ने मात केली. अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डी यांची जोडी देखील पहिल्या फेरीत पराभूत झाली. त्यांना डेन्मार्कच्या मायकेन- सारा यांच्याकडून १३-२१, १२-२१ ने धक्का बसला. (वृत्तसंस्था)