शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

मुंबईकर मानसी पदक मिळवण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 3:29 AM

कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते.

मुंबई : कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते. भले यश मिळो अथवा नको, पण शेवटपर्यंत लढत राहण्याचा निश्चय पत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळतो. अशीच जिद्द मुंबईकर बॅडमिंटनपटू मानसी जोशीमध्ये दिसून येत आहे. अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही न डगमगता ती आगामी पॅरा आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावण्यास सज्ज झाली आहे.एका भीषण रस्ता अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतर २९ वर्षीय मानसीचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न तिने कधीही सोडले नाही आणि आता तिने बॅडमिंटन गुरु पुलेल्ला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ला आगामी पॅरा आशियाई स्पर्धेसाठी सज्ज केले आहे. मुळची मुंबईची असलेली मानसी गेल्या एक महिन्यापासून गोपीचंद अकादमीमध्ये सराव करीत असून जकार्तामध्ये आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत ती सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.डिसेंबर २०११ साली झालेल्या एका भीषण रस्ता अपघातामध्ये मानसीने आपला एक पाय गमावला. यानंतर ती पुन्हा कोर्टवर उतरेल की नाही अशी शंका होती. मात्र, मानसीही हार न मानता मोठ्या जिद्दिने पुनरागमन केले आहे. तिने आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता सराव कायम राखला. मानसी म्हणाली की, ‘मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळते. अपघात झाल्यानंतरही मी हार मानली नाही आणि माझ खेळ सुरु ठेवला.’ दखल घेण्याची बाब म्हणजे कृत्रिम पायाच्या सहाय्याने खेळत असलेल्या मानसीने अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केलेल्या मानसीने अनेक पदकांची कमाईही केली आहे.मानसीने पुढे म्हटले की, ‘मुंबईत रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये सर्वप्रथम कृत्रिम पाय लावला. ज्या कृत्रिम पायाचा मी वापर करते त्यात सेंसर लावण्यात आहेत.’ मानसीची कठोर मेहनत पाहून प्रशिक्षक गोपीचंदही प्रभावित झाले. ती सर्वच लोकांसाठी एक प्रेरणास्थान असल्याचे वक्तव्य गोपीचंद यांनी केले आहे. गोपीचंद म्हणाले की, ‘पॅरा बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्यासाठी अनेक संधी असतात. ती अत्यंत महेनती आहे. तीचा झुंजार खेळ पाहून खूप चांगले वाटते. अनेक सक्षम लोकांसाठी ती प्रेरणास्थान आहे. ती स्पर्धेत नक्कीच यशस्वी कामगिरी करेल.’>सरकारकडून अपेक्षामानसीला कृत्रिम पायाच्या खर्चाचे ओझे वाहून खेळावे लागत आहे. तिने सांगितले की, ‘मी जो कृत्रिम पाय वापरते तो खूप महाग आहे. मला आशा आहे की, यामध्ये मला सरकारकडून काहीप्रमाणात सूट मिळेल. कृत्रिम अवयवांमध्ये नुकताच ५ टक्के जीएसटी जोडण्यात आला आहे. कृत्रिम पायाची किंमत २० लाख रुपये असून दर पाच वर्षांनी हा पाय बदलावा लागतो. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या कितीही सक्षम असाल, तरी हे एक ओझेच आहे.’