शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Asian Games 2018 : सायना, सिंधू उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 05:59 IST

महिला एकेरीत बॅडमिंटनमध्ये पहिलेच पदक : भारतासाठी २ पदके निश्चित

जकार्ता : आॅलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आज येथे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये बॅडमिंटन महिला एकेरी गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यासोबतच भारतासाठी आणखी दोन पदके निश्चित झाले.लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना हिने विश्व रँकिंगमधील पाचव्या क्रमांकाची थायलंडची खेळाडू रतचानोक इंतानोन विरोधात पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यावर शानदार पुनरागमन केले. आणि २१-१८,२१-१६ असा विजय मिळवला. त्यासोबतच ३६ वर्षांनी भारताचा पदकांचा दुष्काळ संपवला. उपांत्य फेरीचा हा सामना ४२ मिनिटे चालला.

आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती खेळाडू सिंधू हिने थायलंडची अन्य खेळाडू जिदापोल नितचाओनला २१-११,१६-२१,२१-१४ असे पराभूत करत पदक निश्चित केले. आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीतील भारताचे हे पहिले पदक आहे. सैयद मोदी हे आशियाई स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवणारे पहिले खेळाडू आहे. त्यांनी १९८२ मध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळवले होते. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना विश्व रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत होईल, तर सायनाची लढत विश्व रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या चिनी तायपेच्या ताय जु यिंगसोबत होईल.आमच्यासाठी हे शानदार आहे; मात्र अजून पदकाची भूक वाढली आहे. मी विचार करत आहे हे सुवर्णपदक असेल. भारताच्या दोन्ही खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा अंतिम फेरीतील लढत रंगेल का, यावर सिंधू म्हणाली की, हे भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार असेल. अंतिम फेरीत दोन खेळाडू भारतीय असतील. -पी. व्ही. सिंधू

ती मजबुतीने खेळली. मला माहीत होते की ती आज कडवे आव्हान देईल. मी गंभीरतेने तिला घेतले. सुरुवातीला माझ्या हालचाली योग्य नव्हत्या; मात्र १२-३ ने स्कोअर केल्यानंतर, मी चांगला खेळ करायला सुरुवात केली. - सायना नेहवाल

टॅग्स :BadmintonBadmintonSaina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधूAsian Games 2018आशियाई स्पर्धा