शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Asian games 2018: कांस्यपदक जिंकले म्हणून सायनाला बाबांनी दिले सुंदर गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 10:37 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत ऐतिहासिक पदक जिंकण्याचा मान बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पटकावला.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत ऐतिहासिक पदक जिंकण्याचा मान बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पटकावला. १९८२ नंतर भारताचे बॅडमिंटन एकेरीतील हे पहिलेच पदक ठरले. पण उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सायनाला पदकाचा रंग बदलता आला नाही. तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, परंतु पहिली भारतीय महिला पदकविजेती बॅडमिंटनपटूचा मान हा तिचाच राहिला. फुलराणी सायनाने भारताला पुन्हा एकदा अविस्मरणीय क्षण अनुभवायची संधी दिली. 1982 नंतर आशियाई स्पर्धेत भारताला बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत सय्यद मोदी यांनी कांस्यपदक जिंकून दिले होते. त्यानंतर आशियाई स्पर्धेतील एकेरीत सायनाने पदक जिंकले. उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या चायनीज तैपेईच्या ताय त्झुंयिंगकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तैपेईच्या खेळाडूने सरळ गेममध्ये 21-17, 21-14 असा विजय मिळवला. पण, या पराभवानंतरही सायनाचे बाबा हरवीर सिंग यांचा आनंद गगनात मावेनासा होता. त्यांनी लगेचच आपल्या लाडक्या लेकिच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी गिफ्ट खरेदी केले. पदकवितरण सोहळा पार पडताच हरवीर यांनी सायनाला एक सोन्याची अंगठी दिली. सायनाने अंगठी बोटात घातली आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून बाबांचे आभार मानले.  

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाBadmintonBadminton