शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मारुतीने का घेतली डिझेलमधून एक्झिट? ही आहेत तीन मुख्य कारणे

By हेमंत बावकर | Updated: April 26, 2019 10:27 IST

मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला.

- हेमंत बावकर 

मुंबई : देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीने डिझेल कार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वाहनप्रेमींसह उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, यामागच्या कारणांचा विचार केल्यास मारुतीचा निर्णय योग्य वाटतो. आर्थिक गणितांबरोबर मारुतीने सरकारी नियमावलींमुळे होणाऱ्या परिणामांची सांगड घातली आहे. 

तसे पाहता मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला. या काळात मारुतीने आजवर फियाटचीच 1.3 मल्टीजेट इंजिन वापरली. हे इंजिन कमालीचे यशस्वीही होते. मायलेज, परवडणारे आणि जास्त मेन्टेनन्स न देणारे असे हे इंजिन होते. यामुळे मारुतीने सरसकट सर्व गाड्यांमध्ये हे इंजिन दिले होते. मारुतीची डिझेल कारची विक्री पाहता एकूण विक्रीपैकी निम्म्याहून जास्त कार या डिझेलच्या आहेत. यामुळे लाखो कोटींचा महसूल हा फियाटला द्यावा लागत होता. यामुळे मारुतीने तेव्हा 1700 कोटी रुपये गुंतवून गुरगावमध्ये डिझेल इंजिन बनविण्याचा प्रकल्प उभारला. यामध्ये कंपनीचे हजारो कोटी रुपये गुंतलेले आहेत. असे असताना भारत सरकारने एकाएकी डिझेलच्या कार 2030 पर्यंत बंद करण्याचा आणि सीएनजी, वीजेवर चालणाऱ्या कार विक्री करण्याचा निर्णय घेतला. याचा पहिला फटका मारुतीच्या भविष्यातील वाढीवर बसला. मारुतीने या काळात 1.5 लीटरचे इंजिन विकसितही केले. हे इंजिन एस क्रॉस, सियाझ या कारमध्ये देण्यात आले आहे. मात्र, एवढा मोठा खर्च करून हे इंजिन काही काळानंतर कालबाह्य होणार याची धास्ती कंपनीला आहे. यातच बीएस 6 उत्सर्जन नियमावलीचे डिझेल इंजिन बनवायचे झाल्यास सध्याच्या बीएस 4 इंजिनापेक्षा त्याची किंमत 2.50 लाख रुपयांनी जास्त असणार आहे. यामुळे सहाजिकच ग्राहकवर्ग पेट्रोलच्या कारपेक्षा 2.5 लाख रुपयांनी जास्त किंमत असलेल्या कारकडे कसा वळणार? हा ही विचार कंपनीने केला आहे. 

महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या पेट्रोल डिझेलचे चढे भाव हे ही एक मोठे कारण यामागे आहे. काही वर्षांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलमधील किमतीमध्ये 20 ते 25 रुपयांचे अंतर होते. आज हेच अंतर सहा-सात रुपयांवर आले आहे. भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती समपातळीवर येतील. यामुळे 2-4 किमीच्या मायलेजसाठी कोणी जादाचे 2.5 लाख रुपये देण्याचे धारिष्ट्य दाखवेल असे वाटत नाही. कारण हा जादाचा पैसा आणि त्यावरील व्याज याचा विचार करता हे पैसे वसूल होण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतील. यामुळे भविष्यात डिझेलची कार घेणे हा आतबट्ट्याचाच व्यवहार ठरणार आहे. 

यापेक्षा पेट्रोल कारलाचा 50-60 हजार रुपये मोजून सीएनजीची कार घेतल्यास त्याचा पर्यावरणावर आणि पर्यायाने खर्चावर फायदा होणार आहे. सध्या सीएनजी फक्त मेट्रो शहरांमध्येच उपलब्ध असला तरीही येत्या दोन वर्षांत तो अन्य ठिकाणीही मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरु आहेत. विजेवर चालणाऱ्या वाहनांनी अद्यापही बाळसे धरलेले नाही. यामुळे सध्यातरी पुढील 10-12 वर्षांसाठी सीएनजीचाच पर्याय कंपनीसमोर आहे. आणि आता बाजारात मारुतीच्या सीएनजी कारनी चांगलेच बस्तान बसविले आहे. यामुळे मारुतीने खर्चात कपात करण्यासाठी 1 एप्रिल 2020 पासून डिझेल कार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पेट्रोल कार घ्यायची की डिझेल? प्रश्न पडतोय का... वाचा...

फोक्सवॅगनचाही निर्णय

असे करणारी मारुती ही एकटीच कंपनी नसून काही महिन्यांपूर्वी फोक्सवॅगन कंपनीनेही 2024 पासून पेट्रोल, डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आता वाहनक्षेत्र नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याने अन्य कंपन्यांकडूनही हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप