शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

लाडक्या मारुतीचा मूळ मालक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 11:18 IST

देशभरात मारुती सुझुकीचे चाहते बरेच आहेत. पण यापैकी बऱ्याचजणांना मात्र या कंपनीचा मूळ मालक कोण आहे हेच माहिती नसेल.

मुंबई : देशभरात मारुती सुझुकीचे चाहते बरेच आहेत. अर्थातच तेवढा मारुतीच्या कारचा खपही आहे. पण यापैकी बऱ्याचजणांना मात्र या कंपनीचा मूळ मालक कोण आहे हेच माहिती नसेल. खासगी कार ही चैनीची गोष्ट असणाऱ्या काळात ही कंपनी उभी राहिली. 1962 मध्ये कारची मागणीही प्रचंड होती. यामुळे वेटिंग पिरिएड हा तब्बल 2 वर्षे होता. अशा काळात मारुती उद्योगाने भरारी घेतली आणि देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली. 

संजय गांधी यांनी रोल्स रॉयस मोटर्स या ब्रिटिश कंपनीत १९६४-१९६७ अॅप्रेंटीशीप पूर्ण केली आणि ते भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांनी कार बनविण्य़ासाठी दिल्लीमध्ये एक लहान वर्कशॉप उभे केले. दोन मानसे कामाला होती. अशातच इंदिरा गांधी सरकारने कार निर्मिती करण्यासाठी परवाना देण्यास तयारी सुरु करताच संजय गांधी यांनी मारुती मोटर्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. हरियाना जवळची २९७ एकर जागा कंपनी उभी करण्यासाठी घेण्यात आली. या कंपनीमध्ये 5000 गाड्या बनविण्याचा परवाना मिळाला खरा पण या निर्णयावरून इंदिरा गांधी यांना मोठी टीका सहन करावी लागली. 

यानंतर आणीबाणी आणि 1977 मध्ये जनता पार्टीच्या सरकारने मारुतीची लावलेली चौकशी, आयोग आदींमुळे मारुतीची स्थापना जरी झालेली असली तरीही गाडी काही पुढे सरकली नव्हती. 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. अशातच एका दुर्दैवी विमान अपघातात संजय गांधी यांचे (२३ जून १९८०) अकाली निधन झाले आणि त्यांचे स्वप्न इंदिरा गांधी यांनी पूर्ण केले. 

खूप प्रयत्नांनंतर २ ऑक्टोबर १९८२ मध्ये भारत सरकार,"मारुती कंपनी आणि सुझुकी कंपनी" यांच्या मध्ये गाडी निर्मितीसाठी संयुक्त करार झाला. डिसेंबर 1983 मध्ये SUZUKI SS 80 ही पहिली कार बनविण्यात आली. या कारला मारुती ८०० असे नाव देण्यात आले. 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी