शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

व्हॉट अ ट्रिक... फक्त २,९९९ रुपयांत घरी घेऊन या इलेक्ट्रिक बाईक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 18:00 IST

रिवॉल्ट (Revolt) कंपनीने भारतीय बाजारपेठेत आज  (28 ऑगस्ट) दोन  इलेक्ट्रीक बाईक्स लॅान्च केल्या आहेत.

नवी दिल्ली: रिवॉल्ट (Revolt) कंपनीने भारतीय बाजारपेठेत आज  (28 ऑगस्ट) दोन  इलेक्ट्रीक बाईक्स लॅान्च केल्या आहेत. यामध्ये रिवॉल्ट आरव्ही 400 आणि रिवॉल्ट आरव्ही 300 यांचा समावेश आहे.  तसेच कंपनीने ग्राहकांना आर्कषीत करण्यासाठी कंपनीने या दोन्ही बाईक्स एका अनोख्या पेमेंट प्लॅनसह लॅान्च केल्या आहेत.

यामध्ये तुम्हाला जर आरव्ही 400चे मॅाडेल खरेदी करायचे असल्यास दर महिन्याला 3499 रुपये आणि टॅाप मॅाडेलसाठी दरमहा 3999 रुपये भरुन तुम्ही ही बाईक खरेदी करता येणार आहे. तसेच आरव्ही 300चे मॅाडलसाठी दरमहा 2999 रुपये भरुन आता खरेदी करता येणार असून हे पैसे तुम्हाला 37 महिने भरावे लागेल. त्याचप्रमाणे यासाठी ग्राहकांना डाउन पेमेंट व भाडेपट्टीची योजना नसून ग्राहक पहिल्या दिवसापासूनच बाईकचा पूर्णपणे मालक असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

रिवॉल्ट आरव्ही 300

आरव्ही 300 इलेक्ट्रीक बाईकमध्ये 1.5KW ची  मोटर आणि  2.7KW ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या बाईकची टॅाप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास इतकी असणार आहे. फुल चार्ज झाल्यानंतर ही बाइक 80 ते 150 किलोमीटर पर्यत चालू शकणार आहे.

रिवॉल्ट आरव्ही 400

आरव्ही 400 इलेक्ट्रीक बाईकमध्ये 3KW ची मोटर आणि 3.24 KW लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही बाइक फुल चार्ज झाल्यानंतर 156 किलोमीटर पर्यत चालू शकणार आहे. त्याचप्रमाणे या बाईकचा टॅाप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास असणार आहे.

रिवोल्ट आरव्ही 400 मॅाडलची विक्रीची सुरुवात सप्टेंबरपासून दिल्ली व पुण्यात होणार आहे. तसेच पुढील चार महिन्यानंतर या इलेक्ट्रीक बाईक बंगळुरू, हैद्राबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नई मध्ये लॅान्च करण्यात येणार आहे.

टॅग्स :bikeबाईक