शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पर्यावरणपूरक इंधन ... इलेक्ट्रिक, मिथेनॉल, हायड्रोजन की गोबरगॅस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 12:44 IST

गोबरगॅसच्या सहाय्यानेही कार चालू शकते हे २०१४ मध्ये दिल्ली आयआयटीने सिद्ध केले आहे. २०३० मध्ये वीजेवरील कार येतील तेव्हा येतील पण गोबरगॅससारख्या खऱ्या अर्थाने देशी ऊर्जेचा वापर करण्यासाठीही खरे म्हणजे प्रयत्न अधिक जोमाने व्हायला हवेत.

भारताने २०३० पर्यंत वीजेवर चालणाऱ्या मोटारींना प्रोत्साहन देण्याचे घोषित केले आहे खरे, पण त्यासाठी खरोखरच किती प्रयत्न चालू आहेत, किती कंपन्या त्यासाठी राजी आहेत, व इतके होऊनही प्रत्यक्षात या वाटचालीला कितपत सुधारणा झाली आहे हा प्रश्न आहे. मुळात पर्यावरणाला हािनकारक न ठरणारे इंधन वापरणे आिण परदेशी चलन जे खिनजतेलावरील आयातीमध्ये खर्च होते ते वाचवणे हे दोन प्रमुख हेतू यामागे आहेत. असे असताना विद्युत इंधनाचा हा पर्याय नेमका काय आहे, यावर सरकारने अद्याप त्यांचे परिपूर्ण असे धोरणही जाहीर केलेले नाही. तर दुसऱ्या बाजूला वीजेद्वारे वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी केंद्रेही अद्याप उभारली गेलेली नाहीत. भारतात हे वीजेवरील वाहनांच्या प्रोत्साहनाचे धोरण चालू असले तरी त्याचबरोबर जग मात्र हायड्रोजन वापरावर भर देत आहे. मर्सिडिस बेंझने सरकारला आग्रह केला आहे की, या विद्युत वाहनांबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नये. तसे केले गेले तर भविष्यामध्ये नव्या पिढीला उद्योगांचे पर्याय बंद केल्यासारखे होईल. आणखीही काही कंपन्यांचा हायड्रोजनचा वापर इंधन म्हमून करण्याबाबत आहे. काही असले तरी डिझेल व पेट्रोलवर चालणारी वाहने २०३० पर्यंत बंद करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे व पर्यावरणात्मक दुष्परिणाम टाळण्यासाठी अन्य इंधनाकडे वळणे आहे.

एका बाजूला विद्युतवाहने (ईव्ही) आणण्यावर भर असला व हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून करण्यासाठी जागतिक स्तरावरही प्रयत्न चालू असले तरी तेही तसे सुरक्षित इंधन आहे का, याचाही विचार करावा लागेल. वास्तविक भारतात आजही शेतीप्रधान पार्श्वभूमीमुळे व दुग्धोत्पादनामधील चांगल्या यशामुळे गोबरगॅसची निर्मिती लक्षात घेऊन गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्याचा वापर केला जात आहे. अर्थात हा वापर शिस्तबद्धपणे तसा सुरू झालेला नाही, नियोजनबद्धपणे तो सुरू केला गेलेला नाही. दिल्ली आयआयटीच्या सीएनजी कार या बायोगॅसवर यशस्वीपणे चालवली, सीएनजीवर चालणाऱ्या वाहनात कोणताही बदल न करता या बायोगॅसचा वापर यशस्वीपणे आणि अधिक किफायती असल्याचा दावा करीत केला गेला. तो खराही आहे. गेल्या वर्षात या गोबरगॅसच्या विकसनातून स्वस्त असा बायोगॅस वापरून कोलकातामध्ये बसही चालवण्यात आली१७.५ किलोमीटर अंतरासाठी अवघ्या एक रुपयात प्रवाशाला नेणे परवडणारी ही बस कोलकात्याच्या कंपनीने आरेखित केली. PHOENIX INDIA RESEARCH & DEVELOPMENT GROUPने ही विकसित केली आहे. छत्तीसगडमधील The Chhattisgarh Renewable Energy Development Agency (CREDA) यांनीही आता त्यादृष्टीने ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. त्यातूनही वीजनिर्मिती शक्य आहे. वास्तविक इतकी स्वस्त व देशातील ग्रामीण जनतेलाही परिपूर्ण करणारी ही प्रणाली असताना, सीएनजीऐवजी गोबरगॅसचाही विचार करायला काही हरकत नाही. गोधनाबाबत खऱ्या अर्थाने श्रीमंत असलेल्या या देशात प्रकल्प मात्र कमी आहेत. त्यातही चीनने बाजी मारली असल्याची माहिती समोर येते. यामुळेच भविष्यातील वाहनांच्या इंधनाबाबत विचार करताना केवळ विद्युत पुरवठ्याने चाजर् होणाऱ्या बॅटऱ्यांवर चालणाऱ्या कारचाच नव्हे तर गोबरगॅसद्वारेही किती उपयुक्तता वाढू शकते व पारंपरिक अशा भारतीय ग्रामीण व शेतीच्या पार्श्वभूमीवर ती किती उपयुक्त ठरू शकते, हेच यातून स्पष्ट होऊ शकेल. मिथेनॉल, गोबरगॅस, सीएनजी, वीज की हायड्रोजन यांच्यापैकी कोणत्या इंधनाचा वापर भारतासाठी योग्य आहे, याचा निर्णय घेण्याची वेळ मात्र नक्की आली आहे.