शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महापूर: बडोद्यात चलन फाडणार नाहीत वाहतूक पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 16:24 IST

महापूराच्या पाण्याने आधीच लोक त्रस्त आहेत. यामुळे कोणाच्या इलेक्ट्रीक वस्तू, कोणाची वाहने तर अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत.

सुरत : गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये महापूर आला होता. यामुळे वाहतूक अधिकाऱ्यांनी बडोद्यातील लोकांसाठी वाहतुकीचे नियम शिथिल केले आहेत. 15 ऑगस्टपर्यंत कोणताही नियम तोडला तरीही चलन फाडण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महापूराच्या पाण्याने आधीच लोक त्रस्त आहेत. यामुळे कोणाच्या इलेक्ट्रीक वस्तू, कोणाची वाहने तर अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यातच घरे, दुकानांमधील वस्तू भिजल्याने नुकसान झाले आहे. यामुळे त्रासामध्ये असलेल्य़ा लोकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक विभागाने 15 ऑगस्टपर्यंत सूट दिली आहे. याकाळात एकही चलन फाडले जाणार नाही. 

बडोदा शहरामध्ये गेल्या आठवड्यात 21 इंचांपर्यंत पाणी भरले होते. यामुळे वाहतूक पोलिसांनी 15 ऑगस्टपर्यंत वाहतूक नियम तोडणारे किंवा वाहतूक कायद्याचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरोधात कोणताही दंड आकारला जाणार नाही. यामागे पोलिसांचे म्हणणे आहे की, नागरिक आधीच अनेक संकटांनी त्रस्त झाले आहेत. यात त्यांना आणखी त्रास देण्याची इच्छा नाही. 

बडोदा शहरात आलेल्या महापूरामध्ये 7 हजार कार आणि 50 हजार दुचाकी पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. गेल्या 31 जुलैला एकाच दिवशी 20 इंच एवढा पाऊस झाला. या कार आणि बाईक दुरुस्त करण्यासाठी जवळपास 23 कोटी खर्च येण्याची शक्यता आहे. तर यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मॅकॅनिकनी सांगितल्यानुसार कमी पाण्यात आणि कमी वेळासाठी बुडालेल्या कार दुरुस्त करण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. मात्र, ज्या कार जास्त काळ आणि पूर्णपणे पाण्यात बुडाल्या होत्या त्यांच्या इंजिनातही पाणी गेले आहे. या कार दुरुस्त करण्यासाठी दीड महिना लागण्याची शक्यता आहे.    

टॅग्स :floodपूरGujaratगुजरात