शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

टायरकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही सुरक्षिततेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:00 IST

टायर चे महत्त्ल प्रत्येक वाहनाच्यादृष्टीने अनन्यसाधारण असून त्या टायरच्या आरोग्याकडे सतत लक्ष ठेवणे हे प्रत्येक कारचालक व मालकाचे महत्त्वाचे कर्तव्यच आहे. कारण तसे करण्याने त्याच्या सुरक्षिततेलाच त्यामुळे तो प्राधान्य देत असतो

ठळक मुद्देसाधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतातविशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा

कार मालक आपल्या कारच्या टायर्सबाबत अनेकदा बेफिकिर असतात. किंबहुना बेफिकिर म्हणण्यापेक्षा कंजूषपणा करण्याचा त्यांचा अधिक प्रयत्न असतो. वास्तिवक कारसाठी त्या टायर्सचे महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे, हे अनेक लोक लक्षात घेत नाहीत. टायरमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेमे अतिशय गरजेचे आहे, हे कधी लक्षात येणार ते कळत नाही.त्यामुळे अनेकदा रिमोल्डिंगचे टायर वापरणारे अनेकजण दिसतात. विशेष करून ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागांमध्येही रिमोल्डिंग टायर वापरणारे कमी नाहीत. व्यावसायिक गाड्या किंवा सेकंडहॅण्ड कार घेऊन त्या भरपूर वापरणाऱ्यांमध्ये टायरकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणारे अनेकजण दिसतात.

साधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतात. विशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम. इतके वर्ष टायर वापरायचा व नंतरच तो काढायचा किंवा विशिष्ट काळ टायर वापरला की रिमोल्डिंग करून घेऊ म्हणजे आणखी जास्त काळ तो चालेल, अशी विविध प्रकारची मते लोकांमध्ये दिसून येतात. टायर ही कायम टिकणारी वस्तू नाही. तिची झीज होत असते. इतकेच नव्हे तर तुम्ही नुसता न वापरता वा फार न वापरता टायर कारला लावला तरी कालांतराने त्यावर परिणाम होत असतो, असे दिसून येते. यासाठी कारच्या टायरवर वेळोवेळी त्याच्या अलाईनमेंटकडे लक्ष द्या, त्याच्या बाह्य भागाची स्थिती पाहा, खराब रस्त्यांवरून चालवताना टायरमधील हवेचे प्रेशरही नीट आहे की नाही ते पाहा. खराब रस्त्यांवर वेगाने नेत कार वळवणे, सतत त्या चाकावर भार येईल अशा प्रकारे ड्रायव्हिंग करणे हेही घोकादायक असते. ३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा.

जोपर्यंत तुम्ही तुमच्या टायरला नीट वागणूक देत नाही, तोयपर्यंत तुम्हाला त्या कारपासून सुरक्षितताही नीट मिळू शकत नाही. आजकाल मोठ्या एक्स्प्रेस वे सारख्या रस्त्यांवर वेगाने कार नेणारे व टायरकडे लक्ष न देणारेही अनेक महाभाग दिसतात. टायर अशा प्रकारच्या रस्त्यांवर वेगमर्यादा ओलांडली गेली तर गरम झाल्याने फुटू शकतो, हे देखील लोकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे नियंत्रण जाणे, गाडी व्हॉबल होणे, स्टिअरिंगवर टायरचे प्रेशर खरे म्हमजे जाणवते तरीही लोकांना ते समजत नाही, ते समजून घ्या. टायर नीट ठेवले तरच कारचे आयुष्य व तुमची सुरक्षितताही वाढणार आहे हे पक्के लक्षात असू द्या.

टॅग्स :Automobileवाहनcarकार