शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

टायरकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही सुरक्षिततेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:00 IST

टायर चे महत्त्ल प्रत्येक वाहनाच्यादृष्टीने अनन्यसाधारण असून त्या टायरच्या आरोग्याकडे सतत लक्ष ठेवणे हे प्रत्येक कारचालक व मालकाचे महत्त्वाचे कर्तव्यच आहे. कारण तसे करण्याने त्याच्या सुरक्षिततेलाच त्यामुळे तो प्राधान्य देत असतो

ठळक मुद्देसाधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतातविशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा

कार मालक आपल्या कारच्या टायर्सबाबत अनेकदा बेफिकिर असतात. किंबहुना बेफिकिर म्हणण्यापेक्षा कंजूषपणा करण्याचा त्यांचा अधिक प्रयत्न असतो. वास्तिवक कारसाठी त्या टायर्सचे महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे, हे अनेक लोक लक्षात घेत नाहीत. टायरमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेमे अतिशय गरजेचे आहे, हे कधी लक्षात येणार ते कळत नाही.त्यामुळे अनेकदा रिमोल्डिंगचे टायर वापरणारे अनेकजण दिसतात. विशेष करून ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागांमध्येही रिमोल्डिंग टायर वापरणारे कमी नाहीत. व्यावसायिक गाड्या किंवा सेकंडहॅण्ड कार घेऊन त्या भरपूर वापरणाऱ्यांमध्ये टायरकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणारे अनेकजण दिसतात.

साधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतात. विशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम. इतके वर्ष टायर वापरायचा व नंतरच तो काढायचा किंवा विशिष्ट काळ टायर वापरला की रिमोल्डिंग करून घेऊ म्हणजे आणखी जास्त काळ तो चालेल, अशी विविध प्रकारची मते लोकांमध्ये दिसून येतात. टायर ही कायम टिकणारी वस्तू नाही. तिची झीज होत असते. इतकेच नव्हे तर तुम्ही नुसता न वापरता वा फार न वापरता टायर कारला लावला तरी कालांतराने त्यावर परिणाम होत असतो, असे दिसून येते. यासाठी कारच्या टायरवर वेळोवेळी त्याच्या अलाईनमेंटकडे लक्ष द्या, त्याच्या बाह्य भागाची स्थिती पाहा, खराब रस्त्यांवरून चालवताना टायरमधील हवेचे प्रेशरही नीट आहे की नाही ते पाहा. खराब रस्त्यांवर वेगाने नेत कार वळवणे, सतत त्या चाकावर भार येईल अशा प्रकारे ड्रायव्हिंग करणे हेही घोकादायक असते. ३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा.

जोपर्यंत तुम्ही तुमच्या टायरला नीट वागणूक देत नाही, तोयपर्यंत तुम्हाला त्या कारपासून सुरक्षितताही नीट मिळू शकत नाही. आजकाल मोठ्या एक्स्प्रेस वे सारख्या रस्त्यांवर वेगाने कार नेणारे व टायरकडे लक्ष न देणारेही अनेक महाभाग दिसतात. टायर अशा प्रकारच्या रस्त्यांवर वेगमर्यादा ओलांडली गेली तर गरम झाल्याने फुटू शकतो, हे देखील लोकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे नियंत्रण जाणे, गाडी व्हॉबल होणे, स्टिअरिंगवर टायरचे प्रेशर खरे म्हमजे जाणवते तरीही लोकांना ते समजत नाही, ते समजून घ्या. टायर नीट ठेवले तरच कारचे आयुष्य व तुमची सुरक्षितताही वाढणार आहे हे पक्के लक्षात असू द्या.

टॅग्स :Automobileवाहनcarकार