शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

टायरकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही सुरक्षिततेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:00 IST

टायर चे महत्त्ल प्रत्येक वाहनाच्यादृष्टीने अनन्यसाधारण असून त्या टायरच्या आरोग्याकडे सतत लक्ष ठेवणे हे प्रत्येक कारचालक व मालकाचे महत्त्वाचे कर्तव्यच आहे. कारण तसे करण्याने त्याच्या सुरक्षिततेलाच त्यामुळे तो प्राधान्य देत असतो

ठळक मुद्देसाधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतातविशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा

कार मालक आपल्या कारच्या टायर्सबाबत अनेकदा बेफिकिर असतात. किंबहुना बेफिकिर म्हणण्यापेक्षा कंजूषपणा करण्याचा त्यांचा अधिक प्रयत्न असतो. वास्तिवक कारसाठी त्या टायर्सचे महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे, हे अनेक लोक लक्षात घेत नाहीत. टायरमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेमे अतिशय गरजेचे आहे, हे कधी लक्षात येणार ते कळत नाही.त्यामुळे अनेकदा रिमोल्डिंगचे टायर वापरणारे अनेकजण दिसतात. विशेष करून ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागांमध्येही रिमोल्डिंग टायर वापरणारे कमी नाहीत. व्यावसायिक गाड्या किंवा सेकंडहॅण्ड कार घेऊन त्या भरपूर वापरणाऱ्यांमध्ये टायरकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणारे अनेकजण दिसतात.

साधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतात. विशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम. इतके वर्ष टायर वापरायचा व नंतरच तो काढायचा किंवा विशिष्ट काळ टायर वापरला की रिमोल्डिंग करून घेऊ म्हणजे आणखी जास्त काळ तो चालेल, अशी विविध प्रकारची मते लोकांमध्ये दिसून येतात. टायर ही कायम टिकणारी वस्तू नाही. तिची झीज होत असते. इतकेच नव्हे तर तुम्ही नुसता न वापरता वा फार न वापरता टायर कारला लावला तरी कालांतराने त्यावर परिणाम होत असतो, असे दिसून येते. यासाठी कारच्या टायरवर वेळोवेळी त्याच्या अलाईनमेंटकडे लक्ष द्या, त्याच्या बाह्य भागाची स्थिती पाहा, खराब रस्त्यांवरून चालवताना टायरमधील हवेचे प्रेशरही नीट आहे की नाही ते पाहा. खराब रस्त्यांवर वेगाने नेत कार वळवणे, सतत त्या चाकावर भार येईल अशा प्रकारे ड्रायव्हिंग करणे हेही घोकादायक असते. ३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा.

जोपर्यंत तुम्ही तुमच्या टायरला नीट वागणूक देत नाही, तोयपर्यंत तुम्हाला त्या कारपासून सुरक्षितताही नीट मिळू शकत नाही. आजकाल मोठ्या एक्स्प्रेस वे सारख्या रस्त्यांवर वेगाने कार नेणारे व टायरकडे लक्ष न देणारेही अनेक महाभाग दिसतात. टायर अशा प्रकारच्या रस्त्यांवर वेगमर्यादा ओलांडली गेली तर गरम झाल्याने फुटू शकतो, हे देखील लोकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे नियंत्रण जाणे, गाडी व्हॉबल होणे, स्टिअरिंगवर टायरचे प्रेशर खरे म्हमजे जाणवते तरीही लोकांना ते समजत नाही, ते समजून घ्या. टायर नीट ठेवले तरच कारचे आयुष्य व तुमची सुरक्षितताही वाढणार आहे हे पक्के लक्षात असू द्या.

टॅग्स :Automobileवाहनcarकार