शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

टायरकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही सुरक्षिततेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:00 IST

टायर चे महत्त्ल प्रत्येक वाहनाच्यादृष्टीने अनन्यसाधारण असून त्या टायरच्या आरोग्याकडे सतत लक्ष ठेवणे हे प्रत्येक कारचालक व मालकाचे महत्त्वाचे कर्तव्यच आहे. कारण तसे करण्याने त्याच्या सुरक्षिततेलाच त्यामुळे तो प्राधान्य देत असतो

ठळक मुद्देसाधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतातविशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा

कार मालक आपल्या कारच्या टायर्सबाबत अनेकदा बेफिकिर असतात. किंबहुना बेफिकिर म्हणण्यापेक्षा कंजूषपणा करण्याचा त्यांचा अधिक प्रयत्न असतो. वास्तिवक कारसाठी त्या टायर्सचे महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे, हे अनेक लोक लक्षात घेत नाहीत. टायरमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेमे अतिशय गरजेचे आहे, हे कधी लक्षात येणार ते कळत नाही.त्यामुळे अनेकदा रिमोल्डिंगचे टायर वापरणारे अनेकजण दिसतात. विशेष करून ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागांमध्येही रिमोल्डिंग टायर वापरणारे कमी नाहीत. व्यावसायिक गाड्या किंवा सेकंडहॅण्ड कार घेऊन त्या भरपूर वापरणाऱ्यांमध्ये टायरकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणारे अनेकजण दिसतात.

साधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतात. विशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम. इतके वर्ष टायर वापरायचा व नंतरच तो काढायचा किंवा विशिष्ट काळ टायर वापरला की रिमोल्डिंग करून घेऊ म्हणजे आणखी जास्त काळ तो चालेल, अशी विविध प्रकारची मते लोकांमध्ये दिसून येतात. टायर ही कायम टिकणारी वस्तू नाही. तिची झीज होत असते. इतकेच नव्हे तर तुम्ही नुसता न वापरता वा फार न वापरता टायर कारला लावला तरी कालांतराने त्यावर परिणाम होत असतो, असे दिसून येते. यासाठी कारच्या टायरवर वेळोवेळी त्याच्या अलाईनमेंटकडे लक्ष द्या, त्याच्या बाह्य भागाची स्थिती पाहा, खराब रस्त्यांवरून चालवताना टायरमधील हवेचे प्रेशरही नीट आहे की नाही ते पाहा. खराब रस्त्यांवर वेगाने नेत कार वळवणे, सतत त्या चाकावर भार येईल अशा प्रकारे ड्रायव्हिंग करणे हेही घोकादायक असते. ३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा.

जोपर्यंत तुम्ही तुमच्या टायरला नीट वागणूक देत नाही, तोयपर्यंत तुम्हाला त्या कारपासून सुरक्षितताही नीट मिळू शकत नाही. आजकाल मोठ्या एक्स्प्रेस वे सारख्या रस्त्यांवर वेगाने कार नेणारे व टायरकडे लक्ष न देणारेही अनेक महाभाग दिसतात. टायर अशा प्रकारच्या रस्त्यांवर वेगमर्यादा ओलांडली गेली तर गरम झाल्याने फुटू शकतो, हे देखील लोकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे नियंत्रण जाणे, गाडी व्हॉबल होणे, स्टिअरिंगवर टायरचे प्रेशर खरे म्हमजे जाणवते तरीही लोकांना ते समजत नाही, ते समजून घ्या. टायर नीट ठेवले तरच कारचे आयुष्य व तुमची सुरक्षितताही वाढणार आहे हे पक्के लक्षात असू द्या.

टॅग्स :Automobileवाहनcarकार