शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जग ईव्हीकडे चाललेय, पण मारुती वेगळ्याच मुडमध्ये; या तीन इंधनांकडे लक्ष द्यायचे म्हणतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 19:15 IST

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे.

ईलेक्ट्रीक कारच्या क्षेत्रात टाटाने भक्कम पाय रोवल्यानंतरही मारुती तिकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. सर्व कंपन्या ईलेक्ट्रीक कारकडे वळत असताना मारुती वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे. भारत सोडून गेलेल्या फोर्डने देखील तिकडे अमेरिकेत इलेक्ट्रीक प्रकल्पांचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. असे असताना भारतातील मारुती आणि अमेरिकेतील फोर्ड या दोन देशांतील सर्वात मोठ्या कंपन्या ईलेक्ट्रीककडे का जात नाहीएत असा प्रश्न पडू लागला आहे. 

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे. जोपर्यंत भारतात ५० टक्के वीज ही अक्षय उर्जा स्रोतांपासून तयार होत नाही तोवर ईलेक्ट्रीक कार कधीही पर्यावरणपूरक ठरू शकणार नाहीत असे म्हटले आहे. काही अंशी त्यांचे बरोबरही आहे. आजही मोठ्या प्रमाणावर वीज ही कोळशापासून बनविली जात आहे. काही ठिकाणी तर ईव्ही चार्जिंग स्टेशन डिझेल जाळून जनरेटरवर चालविली जात आहेत. 

यामुळे भार्गव यांनी सीएनजी, इथेनॉल आणि हायड्रोजन यासारख्या हरित इंधनावर लक्ष केंद्रीत करायला हवे असा प्रस्ताव मांडला आहे. देशाची 75% वीज कोळशापासून तयार केली जाते. हीच वीज आपण इलेक्ट्रीक कार चार्ज करण्यासाठी वापरतो. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीच्या स्वच्छ ज्वलनामुळे सीएनजी वाहनांकडे जाणे देखील अधिक टिकाऊ पर्याय असेल, असे ते म्हणाले आहेत. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने आयोजित केलेल्या 50 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

यामुळे भविष्यात मारुती तरी ईलेक्ट्रीक कार मोठ्या प्रमाणावर आणि लवकर आणण्याची शक्यता कमी दिसत आहे. मारुतीला इलेक्ट्रिक वाहन बाजारात येण्यास खूपच विलंब होत आहे. कंपनीने वॅगन आरची इलेक्ट्रिक आवृत्ती विकसित केली आहे, असेही भार्गव यांनी म्हटले आहे. परंतू, उच्च किंमतीमुळे त्याच्या बाजारपेठेतील व्यवहार्यतेला अडथळा निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरMaruti Suzukiमारुती सुझुकी