शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

जग ईव्हीकडे चाललेय, पण मारुती वेगळ्याच मुडमध्ये; या तीन इंधनांकडे लक्ष द्यायचे म्हणतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 19:15 IST

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे.

ईलेक्ट्रीक कारच्या क्षेत्रात टाटाने भक्कम पाय रोवल्यानंतरही मारुती तिकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. सर्व कंपन्या ईलेक्ट्रीक कारकडे वळत असताना मारुती वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे. भारत सोडून गेलेल्या फोर्डने देखील तिकडे अमेरिकेत इलेक्ट्रीक प्रकल्पांचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. असे असताना भारतातील मारुती आणि अमेरिकेतील फोर्ड या दोन देशांतील सर्वात मोठ्या कंपन्या ईलेक्ट्रीककडे का जात नाहीएत असा प्रश्न पडू लागला आहे. 

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे. जोपर्यंत भारतात ५० टक्के वीज ही अक्षय उर्जा स्रोतांपासून तयार होत नाही तोवर ईलेक्ट्रीक कार कधीही पर्यावरणपूरक ठरू शकणार नाहीत असे म्हटले आहे. काही अंशी त्यांचे बरोबरही आहे. आजही मोठ्या प्रमाणावर वीज ही कोळशापासून बनविली जात आहे. काही ठिकाणी तर ईव्ही चार्जिंग स्टेशन डिझेल जाळून जनरेटरवर चालविली जात आहेत. 

यामुळे भार्गव यांनी सीएनजी, इथेनॉल आणि हायड्रोजन यासारख्या हरित इंधनावर लक्ष केंद्रीत करायला हवे असा प्रस्ताव मांडला आहे. देशाची 75% वीज कोळशापासून तयार केली जाते. हीच वीज आपण इलेक्ट्रीक कार चार्ज करण्यासाठी वापरतो. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीच्या स्वच्छ ज्वलनामुळे सीएनजी वाहनांकडे जाणे देखील अधिक टिकाऊ पर्याय असेल, असे ते म्हणाले आहेत. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने आयोजित केलेल्या 50 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

यामुळे भविष्यात मारुती तरी ईलेक्ट्रीक कार मोठ्या प्रमाणावर आणि लवकर आणण्याची शक्यता कमी दिसत आहे. मारुतीला इलेक्ट्रिक वाहन बाजारात येण्यास खूपच विलंब होत आहे. कंपनीने वॅगन आरची इलेक्ट्रिक आवृत्ती विकसित केली आहे, असेही भार्गव यांनी म्हटले आहे. परंतू, उच्च किंमतीमुळे त्याच्या बाजारपेठेतील व्यवहार्यतेला अडथळा निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरMaruti Suzukiमारुती सुझुकी