शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जग ईव्हीकडे चाललेय, पण मारुती वेगळ्याच मुडमध्ये; या तीन इंधनांकडे लक्ष द्यायचे म्हणतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 19:15 IST

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे.

ईलेक्ट्रीक कारच्या क्षेत्रात टाटाने भक्कम पाय रोवल्यानंतरही मारुती तिकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. सर्व कंपन्या ईलेक्ट्रीक कारकडे वळत असताना मारुती वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे. भारत सोडून गेलेल्या फोर्डने देखील तिकडे अमेरिकेत इलेक्ट्रीक प्रकल्पांचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. असे असताना भारतातील मारुती आणि अमेरिकेतील फोर्ड या दोन देशांतील सर्वात मोठ्या कंपन्या ईलेक्ट्रीककडे का जात नाहीएत असा प्रश्न पडू लागला आहे. 

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे. जोपर्यंत भारतात ५० टक्के वीज ही अक्षय उर्जा स्रोतांपासून तयार होत नाही तोवर ईलेक्ट्रीक कार कधीही पर्यावरणपूरक ठरू शकणार नाहीत असे म्हटले आहे. काही अंशी त्यांचे बरोबरही आहे. आजही मोठ्या प्रमाणावर वीज ही कोळशापासून बनविली जात आहे. काही ठिकाणी तर ईव्ही चार्जिंग स्टेशन डिझेल जाळून जनरेटरवर चालविली जात आहेत. 

यामुळे भार्गव यांनी सीएनजी, इथेनॉल आणि हायड्रोजन यासारख्या हरित इंधनावर लक्ष केंद्रीत करायला हवे असा प्रस्ताव मांडला आहे. देशाची 75% वीज कोळशापासून तयार केली जाते. हीच वीज आपण इलेक्ट्रीक कार चार्ज करण्यासाठी वापरतो. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीच्या स्वच्छ ज्वलनामुळे सीएनजी वाहनांकडे जाणे देखील अधिक टिकाऊ पर्याय असेल, असे ते म्हणाले आहेत. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने आयोजित केलेल्या 50 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

यामुळे भविष्यात मारुती तरी ईलेक्ट्रीक कार मोठ्या प्रमाणावर आणि लवकर आणण्याची शक्यता कमी दिसत आहे. मारुतीला इलेक्ट्रिक वाहन बाजारात येण्यास खूपच विलंब होत आहे. कंपनीने वॅगन आरची इलेक्ट्रिक आवृत्ती विकसित केली आहे, असेही भार्गव यांनी म्हटले आहे. परंतू, उच्च किंमतीमुळे त्याच्या बाजारपेठेतील व्यवहार्यतेला अडथळा निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरMaruti Suzukiमारुती सुझुकी