शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जग ईव्हीकडे चाललेय, पण मारुती वेगळ्याच मुडमध्ये; या तीन इंधनांकडे लक्ष द्यायचे म्हणतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 19:15 IST

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे.

ईलेक्ट्रीक कारच्या क्षेत्रात टाटाने भक्कम पाय रोवल्यानंतरही मारुती तिकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. सर्व कंपन्या ईलेक्ट्रीक कारकडे वळत असताना मारुती वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे. भारत सोडून गेलेल्या फोर्डने देखील तिकडे अमेरिकेत इलेक्ट्रीक प्रकल्पांचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. असे असताना भारतातील मारुती आणि अमेरिकेतील फोर्ड या दोन देशांतील सर्वात मोठ्या कंपन्या ईलेक्ट्रीककडे का जात नाहीएत असा प्रश्न पडू लागला आहे. 

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे. जोपर्यंत भारतात ५० टक्के वीज ही अक्षय उर्जा स्रोतांपासून तयार होत नाही तोवर ईलेक्ट्रीक कार कधीही पर्यावरणपूरक ठरू शकणार नाहीत असे म्हटले आहे. काही अंशी त्यांचे बरोबरही आहे. आजही मोठ्या प्रमाणावर वीज ही कोळशापासून बनविली जात आहे. काही ठिकाणी तर ईव्ही चार्जिंग स्टेशन डिझेल जाळून जनरेटरवर चालविली जात आहेत. 

यामुळे भार्गव यांनी सीएनजी, इथेनॉल आणि हायड्रोजन यासारख्या हरित इंधनावर लक्ष केंद्रीत करायला हवे असा प्रस्ताव मांडला आहे. देशाची 75% वीज कोळशापासून तयार केली जाते. हीच वीज आपण इलेक्ट्रीक कार चार्ज करण्यासाठी वापरतो. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीच्या स्वच्छ ज्वलनामुळे सीएनजी वाहनांकडे जाणे देखील अधिक टिकाऊ पर्याय असेल, असे ते म्हणाले आहेत. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने आयोजित केलेल्या 50 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

यामुळे भविष्यात मारुती तरी ईलेक्ट्रीक कार मोठ्या प्रमाणावर आणि लवकर आणण्याची शक्यता कमी दिसत आहे. मारुतीला इलेक्ट्रिक वाहन बाजारात येण्यास खूपच विलंब होत आहे. कंपनीने वॅगन आरची इलेक्ट्रिक आवृत्ती विकसित केली आहे, असेही भार्गव यांनी म्हटले आहे. परंतू, उच्च किंमतीमुळे त्याच्या बाजारपेठेतील व्यवहार्यतेला अडथळा निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरMaruti Suzukiमारुती सुझुकी