शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

... तर दहा हजार दंड भरण्याची तयारी ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 06:40 IST

वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नका

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार गाडी चालविताना मोबाइलवर बोलल्यास पहिल्या वेळी ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळी १० हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. हा नवीन नियम सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा पकडलेल्या २५ जणांकडून ५७ हजारांचा दंड वसूल केला आहे. 

वाहन चालविताना शरीराचे सर्व अवयव वाहतुकीच्या नियमात अधिनस्त राहून वाहन चालविण्याचे काम करायला हवे, परंतु अनेक लोक वाहन चालविताना वारंवार मोबाइलचा वापर करतात. मोबाइलवर बोलण्याच्या नादात अपघात होतो.

१वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना पहिल्या वेळी ५०० रुपये दंड आकारला जातो.

२ वाहन चालविताना तीच व्यक्ती पुन्हा दुसऱ्या वेळी मोबाइलवर बोलताना आढळली तर १० हजार रुपये दंड आकारण्यात येतो.

मोबाईलवर बोलताना लक्ष विचलित होते. परिणामी, अपघात होण्याची शक्यता अधिक असते. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हे अत्यंत धोकादायक असून, जिवाची पर्वा करण्यासाठी वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये. 

वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. वाहन मर्यादित वेगात चालविणे, तसेच वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन सर्वांनी केल्यास अपघाताला आळा बसेल. परिणामी प्राणहानी होणार नाही. वाहतूक नियम तोडल्यास वाहन चालकाला कारवाईस सामोरे जावे लागेल.- सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस.

अपघाताची शक्यता वाढते    वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यास बोलण्याच्या नादात वाहनावरील संतुलन बिघडते. परिणामी, अपघात होतात.

टॅग्स :carकारRto officeआरटीओ ऑफीसalibaugअलिबागtraffic policeवाहतूक पोलीस