शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

फुल्ल चार्ज्ड... इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने टाकला टॉप गिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 08:31 IST

Electric Vehicles : गेल्या वर्षीच्या सुमारे ४,१९१ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता ऑगस्टपर्यंतच त्यापेक्षा अधिक  ६,९४७ वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वधिक विक्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे.

मुंबई : इंधनाचे वाढते दर व पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून मुंबईकरांनी  मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) खरेदी केली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ६,९४७  इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या सुमारे ४,१९१ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता ऑगस्टपर्यंतच त्यापेक्षा अधिक  ६,९४७ वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वधिक विक्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा इंधनावर होणारा खर्च खूपच कमी झाला आहे. परिणामी, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे.  वर्ष संपण्यास आणखी चार  महिन्यांचा काळ आहे. त्यामुळे दुचाकी विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्यांचा वेग कमी असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. इलेक्ट्रिक वाहन धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये हे धोरण आले. इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढविण्यासाठी २३ जुलै २०२१ रोजी सुधारित धोरण आणण्यात आले. वाहनचालकांनी सर्वाधिक पसंती दुचाकीला दिली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कारपेक्षा दुचाकीला प्राधान्य दिले जात आहे. या वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही तुलनेने कमी आहे. 

गेल्या दोन  वर्षांपासून मी इलेक्ट्रिक दुचाकी वापरत आहे. मेन्टेनन्स अजिबात नाही. रोज तीन ते चार तास चार्ज केल्यानंतर दुचाकी १२० किमीपर्यंत धावते. यामुळे इंधनाच्या खर्चात मोठी बचत होत आहे.- सुरेश नाईक, ई-वाहनधारक

डिझेल आणि पेट्रोलचे दर भयंकर वाढल्याने इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. त्यामुळे खर्चाची मोठी बचत होत आहे.- वसंत सोनावणे, ई-वाहनधारक 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर