शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

फुल्ल चार्ज्ड... इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने टाकला टॉप गिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 08:31 IST

Electric Vehicles : गेल्या वर्षीच्या सुमारे ४,१९१ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता ऑगस्टपर्यंतच त्यापेक्षा अधिक  ६,९४७ वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वधिक विक्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे.

मुंबई : इंधनाचे वाढते दर व पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून मुंबईकरांनी  मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) खरेदी केली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ६,९४७  इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या सुमारे ४,१९१ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता ऑगस्टपर्यंतच त्यापेक्षा अधिक  ६,९४७ वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वधिक विक्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा इंधनावर होणारा खर्च खूपच कमी झाला आहे. परिणामी, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे.  वर्ष संपण्यास आणखी चार  महिन्यांचा काळ आहे. त्यामुळे दुचाकी विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्यांचा वेग कमी असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. इलेक्ट्रिक वाहन धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये हे धोरण आले. इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढविण्यासाठी २३ जुलै २०२१ रोजी सुधारित धोरण आणण्यात आले. वाहनचालकांनी सर्वाधिक पसंती दुचाकीला दिली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कारपेक्षा दुचाकीला प्राधान्य दिले जात आहे. या वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही तुलनेने कमी आहे. 

गेल्या दोन  वर्षांपासून मी इलेक्ट्रिक दुचाकी वापरत आहे. मेन्टेनन्स अजिबात नाही. रोज तीन ते चार तास चार्ज केल्यानंतर दुचाकी १२० किमीपर्यंत धावते. यामुळे इंधनाच्या खर्चात मोठी बचत होत आहे.- सुरेश नाईक, ई-वाहनधारक

डिझेल आणि पेट्रोलचे दर भयंकर वाढल्याने इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. त्यामुळे खर्चाची मोठी बचत होत आहे.- वसंत सोनावणे, ई-वाहनधारक 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर