शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतातील कारची भारतातच होणार सेफ्टी रेटिंग टेस्ट! Bharat NCAP चे गडकरी आज उद्घाटन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:56 IST

आता भारतीय कंपन्यांच्या कार किती सुरक्षित हे पडताळण्यासाठी भारतातच क्रॅश टेस्टिंग सुरु केली जाणार आहे.

देशातील कार किती सुरक्षित आहेत, कोणत्या कंपन्यांच्या कार सुरक्षित आहेत कोणत्या नाहीत हे आजवर ग्लोबल एनकॅपकडून ठरविले जात होते. टाटाच्या कारने पहिल्यांदा देशातील पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग असलेली कारचा खिताब मिळविला होता. आता देशात जवळपास १० च्यावर कार या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. 

आता भारतीय कंपन्यांच्या कार किती सुरक्षित हे पडताळण्यासाठी भारतातच क्रॅश टेस्टिंग सुरु केली जाणार आहे. भारतीय एनकॅपचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्घाटन करणार आहेत. देशात सध्या टाटा, महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन या कंपन्यांच्या कारना फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. 

भारत एनकॅपमध्ये काय खास गोष्टी असतील चला पाहुयात...भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (एनसीएपी) Bharat New Car Assessment Program (Bharat NCAP) मध्ये वाहन उत्पादक या कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) 197 नुसार स्वेच्छेने त्यांच्या वाहनांची चाचणी घेऊ शकतात. वाहनांना त्यांच्या चाचणी आणि कार्यक्षमतेच्या आधारे प्रौढ प्रवासी (AOP) आणि लहान मुलांसाठी (COP) स्टार रेटिंग दिले जाणार आहे. 

भारतातील मोटार वाहनांची सुरक्षितता 3.5 टनांपर्यंत वाढवून रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे सुरक्षित वाहनांची मागणी वाढेल व पाण्यासारख्या गाड्या विकणाऱ्या कंपन्या यापुढे वाहनांच्या सुरक्षिततेकेड लक्ष देतील, अशी अपेक्षा सरकारला आहे. 

टॅग्स :Accidentअपघात