शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

एक रुपयात एक किलोमीटर! इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली, प्रदूषणही टळते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 09:06 IST

आता वाहने ही केवळ लक्झरी राहिलेली नाहीत तर आता ती लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे.

- मनोज गडनीस

ट्रोल-डिझेल, सीएनजी आदी इंधनाच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता वाहनप्रेमी लोकांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, या वाहनांद्वारे येणारा प्रवास खर्च हा प्रति एक किलोमीटर सरासरी एक रुपया इतका कमी असल्याने लोकांची इंधनावरील खर्चात तर बचत होत आहेच, पण या वाहनांमधून प्रदूषण होत नसल्यामुळे पर्यावरणस्नेही प्रवासाचा आनंददेखील लोकांना मिळत आहे. 

दुसरा मुद्दा म्हणजे, आता वाहने ही केवळ लक्झरी राहिलेली नाहीत तर आता ती लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे. अशा वेळी जर इंधन महागले असेल तर रोजचा प्रवास करणेही परवडणार नाही आणि सारेच आर्थिक गणित विस्कळीत होईल. अशा स्थितीत पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वाहन हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

इंधनाचे गणित कसे आहे?

पेट्रोल आणि डिझेल या प्रमुख इंधनाच्या दरांनी १०० रुपयांचा टप्पा पार केल्यामुळे अनेकांसाठी ही इंधने आता आवाक्याच्या बाहेर गेलेली आहेत. तसेच, ए,बी,सी,डी अशा अर्थात साध्या ते आलिशान अशा कोणत्याही गाडीने जर प्रवास करायचा तर त्या वाहनांचा ॲव्हरेज हा प्रति किलोमीटर किमान १० ते कमाल १४ रुपये इतका आहे. 

मुंबईसारख्या शहरांत जिथे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी वाहतूककोंडी असते अशा ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर हा ॲव्हरेज प्रति किलोमीटर ६ ते ८ रुपये इतकाच मिळतो. आता पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि मिळणारा हा ॲव्हरेज जर विचारात घेतला तर हा हिशोब प्रति किलोमीटर खर्च सरासरी १० ते १२ रुपये प्रति किलोमीटर इतका जातो.

गेल्या वर्षभरापर्यंत सीएनजीच्या किमती या ४० रुपये प्रति किलोच्या आसपास होत्या. त्यामध्ये आता दुपटीने वाढ होत प्रति किलो दर हे ८६ रुपये झाले आहेत. गाडीने जरी सरासरी १० किलोमीटर प्रति किलो ॲव्हरेज दिला तरी प्रति किलोमीटर हा प्रवास ८ रुपये ६० पैसे दराने पडतो. चार वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा सीएनजीच्या किमती २० आणि २२ रुपये प्रति किलो होत्या तेव्हा या इंधनाद्वारे चालणाऱ्या गाडीचा खर्च ८० पैसे ते एक रुपया प्रति किलोमीटर इतका होत होता. आता मात्र त्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केला तर, जर गाडीची संपूर्ण बॅटरी चार्ज झाली तर इलेक्ट्रिक वाहन त्याच्या बॅटरीच्या क्षमतेनुसार अंदाजे ३०० ते ३५० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. याकरिता लागणाऱ्या विजेचे दर हे व्यावसायिक आहेत. मात्र, सरासरी हिशेब काढला तर प्रति किलोमीटर १ रुपया ते १.१५ पैसे या दरम्यान या वाहनाचा दर पडतो. 

देशात इलेक्ट्रिक वाहने किती ?

दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या एकूण १२ कंपन्या देशामध्ये आहेत. सप्टेंबर २०२२ पर्यंत यांचा एकत्रित आकडा हा १३ लाख ९२ हजार २६५ इतका आहे. सप्टेंबर २०२१ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी झालेली वाढ ही तब्बल १५८ टक्के जास्त आहे.

आगामी काळात काय ट्रेन्ड असेल ?

  • तीन ते चार वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे.
  • सुरुवातीला कोरियन, जपानी कंपन्यांनी वाहने सादर केली होती.
  • या वाहनांमध्ये असलेली क्षमता आणि ग्राहकांची खर्चात होणारी बचत लक्षात घेता, आता वाहन निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीस सुरुवात केली आहे.
  • दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने आगामी काळात प्रामुख्याने इलेक्ट्रिकवर येताना दिसतील.
  • ही वाहने पर्यावरणस्नेही असल्यामुळे सरकारने यातील काही विशिष्ट वाहनांसाठी अनुदान योजनादेखील जाहीर केलेली आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्यानंतर, ज्या कंपनीचे वाहन आहे, त्यांच्यातर्फेच घर किंवा कार्यालयामध्ये चार्जिंगची व्यवस्था केली जाते.
  • या चार्जिंगकरिता होणारा विजेचा खर्च वेगळा ठेवण्यासाठी विजेचे वेगळे मीटरदेखील बसविण्यात येते.
  • जर तुम्ही प्रवास करत असला तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक चार्जिंगची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.
  • काही कंपन्यांच्या शोरूममध्येदेखील चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
  • एक्सटर्नल चार्जिंगद्वारेदेखील तुम्हाला चार्जिंग करता येते. 
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरelectricityवीजIndiaभारत