शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

एक रुपयात एक किलोमीटर! इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली, प्रदूषणही टळते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 09:06 IST

आता वाहने ही केवळ लक्झरी राहिलेली नाहीत तर आता ती लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे.

- मनोज गडनीस

ट्रोल-डिझेल, सीएनजी आदी इंधनाच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता वाहनप्रेमी लोकांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, या वाहनांद्वारे येणारा प्रवास खर्च हा प्रति एक किलोमीटर सरासरी एक रुपया इतका कमी असल्याने लोकांची इंधनावरील खर्चात तर बचत होत आहेच, पण या वाहनांमधून प्रदूषण होत नसल्यामुळे पर्यावरणस्नेही प्रवासाचा आनंददेखील लोकांना मिळत आहे. 

दुसरा मुद्दा म्हणजे, आता वाहने ही केवळ लक्झरी राहिलेली नाहीत तर आता ती लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे. अशा वेळी जर इंधन महागले असेल तर रोजचा प्रवास करणेही परवडणार नाही आणि सारेच आर्थिक गणित विस्कळीत होईल. अशा स्थितीत पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वाहन हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

इंधनाचे गणित कसे आहे?

पेट्रोल आणि डिझेल या प्रमुख इंधनाच्या दरांनी १०० रुपयांचा टप्पा पार केल्यामुळे अनेकांसाठी ही इंधने आता आवाक्याच्या बाहेर गेलेली आहेत. तसेच, ए,बी,सी,डी अशा अर्थात साध्या ते आलिशान अशा कोणत्याही गाडीने जर प्रवास करायचा तर त्या वाहनांचा ॲव्हरेज हा प्रति किलोमीटर किमान १० ते कमाल १४ रुपये इतका आहे. 

मुंबईसारख्या शहरांत जिथे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी वाहतूककोंडी असते अशा ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर हा ॲव्हरेज प्रति किलोमीटर ६ ते ८ रुपये इतकाच मिळतो. आता पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि मिळणारा हा ॲव्हरेज जर विचारात घेतला तर हा हिशोब प्रति किलोमीटर खर्च सरासरी १० ते १२ रुपये प्रति किलोमीटर इतका जातो.

गेल्या वर्षभरापर्यंत सीएनजीच्या किमती या ४० रुपये प्रति किलोच्या आसपास होत्या. त्यामध्ये आता दुपटीने वाढ होत प्रति किलो दर हे ८६ रुपये झाले आहेत. गाडीने जरी सरासरी १० किलोमीटर प्रति किलो ॲव्हरेज दिला तरी प्रति किलोमीटर हा प्रवास ८ रुपये ६० पैसे दराने पडतो. चार वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा सीएनजीच्या किमती २० आणि २२ रुपये प्रति किलो होत्या तेव्हा या इंधनाद्वारे चालणाऱ्या गाडीचा खर्च ८० पैसे ते एक रुपया प्रति किलोमीटर इतका होत होता. आता मात्र त्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केला तर, जर गाडीची संपूर्ण बॅटरी चार्ज झाली तर इलेक्ट्रिक वाहन त्याच्या बॅटरीच्या क्षमतेनुसार अंदाजे ३०० ते ३५० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. याकरिता लागणाऱ्या विजेचे दर हे व्यावसायिक आहेत. मात्र, सरासरी हिशेब काढला तर प्रति किलोमीटर १ रुपया ते १.१५ पैसे या दरम्यान या वाहनाचा दर पडतो. 

देशात इलेक्ट्रिक वाहने किती ?

दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या एकूण १२ कंपन्या देशामध्ये आहेत. सप्टेंबर २०२२ पर्यंत यांचा एकत्रित आकडा हा १३ लाख ९२ हजार २६५ इतका आहे. सप्टेंबर २०२१ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी झालेली वाढ ही तब्बल १५८ टक्के जास्त आहे.

आगामी काळात काय ट्रेन्ड असेल ?

  • तीन ते चार वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे.
  • सुरुवातीला कोरियन, जपानी कंपन्यांनी वाहने सादर केली होती.
  • या वाहनांमध्ये असलेली क्षमता आणि ग्राहकांची खर्चात होणारी बचत लक्षात घेता, आता वाहन निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीस सुरुवात केली आहे.
  • दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने आगामी काळात प्रामुख्याने इलेक्ट्रिकवर येताना दिसतील.
  • ही वाहने पर्यावरणस्नेही असल्यामुळे सरकारने यातील काही विशिष्ट वाहनांसाठी अनुदान योजनादेखील जाहीर केलेली आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्यानंतर, ज्या कंपनीचे वाहन आहे, त्यांच्यातर्फेच घर किंवा कार्यालयामध्ये चार्जिंगची व्यवस्था केली जाते.
  • या चार्जिंगकरिता होणारा विजेचा खर्च वेगळा ठेवण्यासाठी विजेचे वेगळे मीटरदेखील बसविण्यात येते.
  • जर तुम्ही प्रवास करत असला तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक चार्जिंगची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.
  • काही कंपन्यांच्या शोरूममध्येदेखील चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
  • एक्सटर्नल चार्जिंगद्वारेदेखील तुम्हाला चार्जिंग करता येते. 
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरelectricityवीजIndiaभारत