शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट! भारतीय लष्कराने बनविले AI आधारित अपघात नियंत्रण यंत्र, लाखोंचे जीव वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:10 IST

भारतातच नाही तर जगभरात रस्ते अपघात हे एक डोकेदुखी ठरले आहेत. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता येत नाहीएत.

भारतीय लष्कराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने एक महत्वाचे डिव्हाईस बनविले आहे, ज्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचणार आहे. या डिव्हाईससाठी पेटंटही मिळला आहे. भारतातच नाही तर जगभरात रस्ते अपघात हे एक डोकेदुखी ठरले आहेत. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता येत नाहीएत. यामुळे आर्मीचे हे डिव्हाईस खूप दिलासा देणार आहे. 

बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागली की होत असतात. यामध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. AI बेस्ड हे डिव्हाईस ड्रायव्हरवर लक्ष ठेवणार आहे. त्याला डुलकी लागली रे लागली की ते अलार्म वाजविणार आहे व चालकाला जागे करणार आहे. या यंत्रामुळे अपघातावर नियंत्रण मिळविण्यास फायदा होणार असल्याचा दावा लष्कराने केला आहे. 

भारतीय सैन्य अधिकारी कर्नल कुलदीप यादव यांनी हे उपकरण विकसित केले आहे. 2021 मध्येच त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला होता, जो आता प्रमाणित झाला आहे. भारतीय लष्कराने सांगितले की त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अपघात प्रतिबंधक प्रणालीचे पेटंट मिळाले आहे. लष्कराने हे ट्विट करून कळविले आहे. अपघात प्रतिबंधक उपकरण लष्कराच्या संशोधन आणि विकास (R&D) घटकाने विकसित केले आहे, असे आर्मीने म्हटले आहे. 

हे उपकरण कोणत्याही वाहनात सहज बसवता येते. वाहनाच्या डॅशबोर्डवर बसवलेले सेन्सर-सुसज्ज उपकरण ड्रायव्हरच्या डोळ्यांवर लक्ष ठेवते आणि जेव्हा तो डोळे बंद करतो तेव्हा त्याला सतर्क करते. यासाठी काही ठराविक वेळ देण्यात आली आहे. या उपकरणाची चाचणी पर्वत, वाळवंट आणि महामार्गांवर वेगवेगळ्या परिस्थितीत करण्यात आली आहे आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. आता चाचणीनंतर भारतीय लष्कराच्या सर्व वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवली जात आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या परिवहन महामंडळांच्या बसमध्ये AI-आधारित यंत्राची चाचणी घेण्यात आली होती. 

याचा वापर ट्रकमध्येही करता येणार आहे. मणिपूरमध्ये लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करताना कर्नल कुलदीप यादव यांच्या मनात हा विचार आला होता. डोंगरात गाडी चालवताना चालक थकतात आणि झोपतात, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत होती. 2021 मध्ये देशात रस्ते अपघातात सुमारे 1.54 लाख लोकांचा मृत्यू झाला. एका अहवालानुसार, 57 टक्क्यांहून अधिक ट्रकचे अपघात ड्रायव्हर झोपेमुळे होतात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAccidentअपघात