शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सॅल्यूट! भारतीय लष्कराने बनविले AI आधारित अपघात नियंत्रण यंत्र, लाखोंचे जीव वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:10 IST

भारतातच नाही तर जगभरात रस्ते अपघात हे एक डोकेदुखी ठरले आहेत. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता येत नाहीएत.

भारतीय लष्कराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने एक महत्वाचे डिव्हाईस बनविले आहे, ज्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचणार आहे. या डिव्हाईससाठी पेटंटही मिळला आहे. भारतातच नाही तर जगभरात रस्ते अपघात हे एक डोकेदुखी ठरले आहेत. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता येत नाहीएत. यामुळे आर्मीचे हे डिव्हाईस खूप दिलासा देणार आहे. 

बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागली की होत असतात. यामध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. AI बेस्ड हे डिव्हाईस ड्रायव्हरवर लक्ष ठेवणार आहे. त्याला डुलकी लागली रे लागली की ते अलार्म वाजविणार आहे व चालकाला जागे करणार आहे. या यंत्रामुळे अपघातावर नियंत्रण मिळविण्यास फायदा होणार असल्याचा दावा लष्कराने केला आहे. 

भारतीय सैन्य अधिकारी कर्नल कुलदीप यादव यांनी हे उपकरण विकसित केले आहे. 2021 मध्येच त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला होता, जो आता प्रमाणित झाला आहे. भारतीय लष्कराने सांगितले की त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अपघात प्रतिबंधक प्रणालीचे पेटंट मिळाले आहे. लष्कराने हे ट्विट करून कळविले आहे. अपघात प्रतिबंधक उपकरण लष्कराच्या संशोधन आणि विकास (R&D) घटकाने विकसित केले आहे, असे आर्मीने म्हटले आहे. 

हे उपकरण कोणत्याही वाहनात सहज बसवता येते. वाहनाच्या डॅशबोर्डवर बसवलेले सेन्सर-सुसज्ज उपकरण ड्रायव्हरच्या डोळ्यांवर लक्ष ठेवते आणि जेव्हा तो डोळे बंद करतो तेव्हा त्याला सतर्क करते. यासाठी काही ठराविक वेळ देण्यात आली आहे. या उपकरणाची चाचणी पर्वत, वाळवंट आणि महामार्गांवर वेगवेगळ्या परिस्थितीत करण्यात आली आहे आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. आता चाचणीनंतर भारतीय लष्कराच्या सर्व वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवली जात आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या परिवहन महामंडळांच्या बसमध्ये AI-आधारित यंत्राची चाचणी घेण्यात आली होती. 

याचा वापर ट्रकमध्येही करता येणार आहे. मणिपूरमध्ये लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करताना कर्नल कुलदीप यादव यांच्या मनात हा विचार आला होता. डोंगरात गाडी चालवताना चालक थकतात आणि झोपतात, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत होती. 2021 मध्ये देशात रस्ते अपघातात सुमारे 1.54 लाख लोकांचा मृत्यू झाला. एका अहवालानुसार, 57 टक्क्यांहून अधिक ट्रकचे अपघात ड्रायव्हर झोपेमुळे होतात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAccidentअपघात