शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

Hydrogen Car: हायड्रोजन कार, 1 किलोला 400 किमीचे मायलेज देणार; गडकरींनी सांगितली किलोची किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:36 IST

Hydrogen car in india: 'येत्या दीड ते दोन वर्षांत भारतातील नागरिकांना हायड्रोजन कार वापरता येणार.'

Hydrogen Car Nitin Gadkari: भारतात लवकरच हायड्रोजन इंधनावर चालणारी गाड्या धावताना दिसणार आहेत. भारत सरकार सतत इलेक्ट्रिक आणि बायो-इंधन वाहनांवर भर देत आहे. पण, भारतात सामान्यांना बायो इंधनावर चालणाऱ्या गाड्या कधीपासून वापरता येतील, याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी माहिती दिली. 

भारत लवकरच इंधन निर्यात करेलमंगळवारी आयोजित एका अवॉर्ड्स शोमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाढते प्रदूषण आणि याला आळा घालण्यावरही भाष्य केले. गडकरी म्हणाले की, 'भारतात हायड्रोजन कारमध्ये वापरण्यासाठी बायो इंधन तयार केले जात आहे. यासाठी कचऱ्याचा वापर होतोय. आता आपल्याला इंधन आयात करण्यची गरज नाही. भविष्यात भारत बायो इंधन निर्यात करेल.' 

1 किलो हायड्रोजनमध्ये 400 किमी गडकरी पुढे म्हणाले की, 'पाण्यावर गाडी चालू शकते, यावर एकेकाळी माझ्या पत्नीचाही माझ्यावर विश्वास नव्हता. पण, आता हे शक्य झाले आहे. आता लवकरच बायो इंधनावर गाड्या चालतील. येत्या दीड ते दोन वर्षांत भारतात लोक हायड्रोजन कार चालवू शकतील. प्रतिकिलो हायड्रोजन 80 रुपयात मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे. 1 किलो हायड्रोजनमध्ये 400 किमी धावू शकते,' विशेष म्हणजे, या पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी भारतातील पहिल्या हायड्रोजन कारमधून आले.

भारतात हायड्रोजन कारचे उत्पादनआता हायड्रोजन कारचे भारतात होणार आहे, त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सध्या हायड्रोजन तीन प्रकारे बनवले जात आहे. काळा हायड्रोजन जो कोळशापासून बनवला जातो. तपकिरी हायड्रोजन जो पेट्रोलियम पदार्थातून बनवला जातो. तिसरा प्रकार ग्रीन हायड्रोजन आहे. हा हायड्रोजन कचरा, सांडपाणी किंवा पाण्यापासून बनवता येतो. सध्या भारतात इलेक्ट्रीक वाहनांचा खप एवढा वाढला आहे की, अनेक वाहने एक ते दीड वर्षांच्या वेटिंगवर आहेत. लवकरच भारत वाहनांच्या प्रदूषणापासून मुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन