शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

वाहतुकीचे नियम मोडण्याची हिंमत होणार नाही एवढा दंड ठोठावणार मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 16:08 IST

मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर होणाऱ्या दंडाची रक्कम दुपटीने वाढविली होती.

नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाने सोमवारी मोटर वाहन (संशोधन) विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. महत्वाच्या वाहनांना रस्ता न दिल्यास 10000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.  

मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर होणाऱ्या दंडाची रक्कम दुपटीने वाढविली होती. तरीही रस्ते अपघात आणि वाहतूक कोंडीमध्ये वाढच होत होती. यामुळे मोदी सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर लगेचच या कायद्यामध्ये बदल करण्याची पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये नियम मोडणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी हा दंड मोठ्या स्वरूपात आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या विधेयकाला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून लवकरच या कायद्यात रुपांतर केले जाणार आहे. यामध्ये इन्शुरन्सशिवाय वाहन चालविल्यास 2000 रुपयांचा दंड, हॅल्मेट न घातल्यास 1000 रुपये आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे. 

अल्पवयीनाने वाहन चालविताना आढळल्यास वाहनाचा मालक आणि पालकांना दोषी ठरवत वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाणार आहे. याशिवाय तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वाहतूक नियम तोडल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाईल. सध्या 100 रुपयांचा दंड आकारला जातो. तर संबंधीत प्रशासनाचा आदेश न मानल्यास 500 रुपयांऐवजी 2000 रुपयांचा दंड लागणार आहे. 

वेगात गाडी चालविल्यास 1000 ते 2000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर वाहन परवान्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कॅब चालकांना 1 लाख रुपयांचा दंड होणार आहे. ओव्हरलोडिंगसाठी 20 हजार रुपये दंड आकारला जाईल. या विधेयकाला संसदेच्या अधिवेशनात मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एका वृत्त समुहाच्या सुत्र्यांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीNarendra Modiनरेंद्र मोदी