शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 400 टक्के वाढ; पॉलिसीमुळे मागणी वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:26 IST

Electric Vehicle Policy : राज्यात 2021-22 मध्ये नवीन ईव्हीच्या नोंदणीमध्ये 400% वाढ झाली आहे. दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल सांगायचे झाले तर येथे 300% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची (EVs) मागणीही वाढत आहे. गेल्या काही वर्षांत ईव्हीच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. परिवहन विभागाच्या नवीन आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण संख्येने 80,000 चा टप्पा ओलांडला आहे, ज्यामध्ये मुंबईतील 8,938 चा समावेश आहे. राज्यात 2021-22 मध्ये नवीन ईव्हीच्या नोंदणीमध्ये 400% वाढ झाली आहे. दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल सांगायचे झाले तर येथे 300% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

2022 मध्ये दुप्पट झाली ईव्हीची नोंदणीआकडेवारीनुसार, राज्यात एप्रिल ते डिसेंबर 2021 दरम्यान 23,796 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती आणि त्यानंतर जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान ही संख्या दुप्पट होऊन 46,108 झाली. हे गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे 390% जास्त आहे. ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात 9,415 इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत होती. तर 2019-20 मध्ये 7,400 आणि 2018-19 मध्ये 6,300 होते.

ईव्ही पॉलिसीमुळे मागणी वाढली आकडेवारी दर्शवते की, मुंबईत 2021-22 मध्ये जळपास 6,000 ईव्हीची नोंदणी झाली होती, त्यापैकी 2,500 एका गेल्या तीन महिन्यांत होत्या. राज्य सरकारने लागू केलेल्या ईव्ही पॉलिसीमुळे मागणीत अचानक वाढ होताना दिसत आहे. या पॉलिसीप्रमाणे, खरेदीदारांना प्रोत्साहन मिळते आणि अनेक प्रकारच्या सवलती मिळतात. तर BMC चा मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (MCAP) ईव्हीच्या विकासाला प्रोत्साहन देते.

राज्य सरकारचे उद्दिष्टदरम्यान, राज्यात गेल्या वर्षी ईव्ही पॉलिसी लाँच करणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत आधीच सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीत ईव्हीच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ईव्ही पॉलिसीचे उद्दिष्ट 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये 10% इलेक्ट्रिक वाहने गाठण्याचे आहे. यामध्ये प्रत्येक 3×3 किमी ग्रिडमध्ये किमान एक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन स्थापित करणे अनिवार्य आहे.

इतक्या लोकांना फायदा होईल का?ईव्ही पॉलिसी अंतर्गत, 2025 पर्यंत, राज्यातील जवळपास 14,000 इलेक्ट्रिक चारचाकी, 1.8 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि 22,000 इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा खरेदीदार या योजनेचा लाभ घेऊ शकतील. याचबरोबर, 2030 पर्यंत जवळपास एक लाख इलेक्ट्रिक चारचाकी, 9.6 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि 1.5 लाख इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा खरेदीदार या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbusinessव्यवसायMaharashtraमहाराष्ट्र