शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

इलेक्ट्रिक व्हेइकल्सना मिळणार ‘ऊर्जा’; राज्यभरात उभारले जाणार दीड हजार चार्जिंग पॉइंट्स, महामार्गांना प्राधान्य

By सचिन लुंगसे | Updated: July 31, 2022 06:13 IST

ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती देण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल यांच्या सदस्यांच्या विकासक मालमत्तांमध्ये ५ हजार ईव्ही चार्जिंग पॉइंट्स बसविण्यासाठी टाटा पॉवरने सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती टाटा पॉवरचे मुंबई वितरण प्रमुख नीलेश काणे यांनी दिली. 

- सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विजेवर धावणाऱ्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेत, यंदाच्या वर्षी राज्यभरात १५०० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स उभारले जाणार आहेत. या चार्जिंग पॉइंट्सपैकी बहुतांश केंद्रे महामार्गांवर असतील. तूर्त सर्व प्रमुख महामार्गांवर १०० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स असून, २०२३च्या अखेरपर्यंत ही संख्या ३५० पर्यंत वाढविली जाणार आहे. २०२३ साली महाराष्ट्रभरातील महामार्गांवर दोन्ही बाजूंना दर १२५ ते १५० कि.मी. अंतरावर चार्जर्स बसविले जातील. ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती देण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल यांच्या सदस्यांच्या विकासक मालमत्तांमध्ये ५ हजार ईव्ही चार्जिंग पॉइंट्स बसविण्यासाठी टाटा पॉवरने सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती टाटा पॉवरचे मुंबई वितरण प्रमुख नीलेश काणे यांनी दिली. 

१००० केंद्रे मुंबईत मुंबई आणि उपनगरांमध्ये ६०० पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. २०२३ संपेपर्यंत हा आकडा १ हजारावर जाईल. मोठे मॉल्स, पार्किंगच्या सार्वजनिक जागांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे.

किती धावते एक वाहन ?३० केडब्ल्यूएच बॅटरी क्षमता असेल तर वाहन २००-२२० कि.मी. अंतर धावू शकते.

एक कार चार्ज व्हायला किती वेळ?n कारच्या बॅटरीचा आकार आणि चार्जिंग ज्या चार्जरने केले जात आहे, त्याची क्षमता यावर हे अवलंबून असते. साधारणपणे चारचाकी ईव्हीच्या बॅटरीची क्षमता जवळपास ३० केडब्ल्यूएच असते. n जर ही कार एका ३० केडब्ल्यू डीसी वेगवान चार्जरने चार्ज केली जात असेल, तर एका तासात बॅटरी पूर्ण चार्ज होईल. n जर तीच कार एका ७.४ केडब्ल्यूच्या एसी टाईप-२ चार्जरने चार्ज केली जात असेल, तर चार्जिंग पूर्ण होण्यास जवळपास ४ तास लागतात.

कार्बन उत्सर्जनात घटवाहनांमधून दरवर्षी जवळपास ५०० मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन होते. चारचाकी आणि तीनचाकी विभागांत सर्वच्या १०० टक्के गाड्या विजेवर चालणाऱ्या असतील तर कार्बन उत्सर्जनात ३५ टक्के घट होईल.

राज्यात विजेवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या जवळपास ७००० आणि वर्षभरात सरासरी १२ हजार कि.मी. प्रवास असे गृहीत धरल्यास वर्षभरात ६०लाख लीटर इंधनाची बचत होऊ शकते.

n केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने चार्जिंग पॉइंट्स उभारण्याचे काम टाटा पॉवर करीत आहे. पुणे-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे महामार्गावर चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर