शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 17:24 IST

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे.

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे. सर्वाधिक खपाच्या दोन कार अल्टो आणि वॅगन आर या आता विजेवर चालणार आहेत. मात्र, या कार मारुती सुझुकी नाही तर एक स्टार्टअप कंपनी विकणार आहे. धक्का बसला ना, खरे आहे. 

इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी कंपन्यांनी कंबर कसली आहे. मात्र, लोकांनी या कार महागड्या असणार असल्याने धास्ती घेतली आहे. यामुळे अल्टो आणि वॅगनआर सारखी खिशाला परवडणारी कार जर विजेवर चालणारी असेल तर त्यांना दिलासा मिळणार आहे. या दोन्ही कार पेट्रोलवर चालणाऱ्या कार आहेत. तेलगानाच्या E-trio Automobiles या स्टार्टअप कंपनीने मारुतीची आणि एआरएआयची परवानगी घेऊन दोन्ही कार विजेवर चालण्यासाठी तयार केल्या आहेत. यामुळे सध्याच्या कारचे काय होणार हा प्रश्नही काहीसा निकाली निघाला आहे. E-trio ही ARAI ची मान्यता मिळालेला पहिली कंपनी आहे. 

E-trio ही कंपनी सध्याच्या IC इंजिन वाल्या कारवर काम करत आहे. यामुळे महागड्या इलेक्ट्रीक कार घेण्यापेक्षा वाहनमालक त्यांच्याकडील वापरातील कारमध्ये आवश्यक बदल करून विजेवर चालवू शकणार आहेत. 

सध्या ही कंपनी Alto आणि WagonR या कारला विजेवर चालविण्याची सेवा देत आहे. या कारची दोन वर्षांपासून चाचणी सुरु आहे. E-trio ने सांगितले की या वाहनांना गिअरची गरज राहत नाही. रेट्रोफिट किट बसविल्यानंतर या कार 150 किमीच्या वेगाने धावतात. चाचणीवेळी या कारनी तब्बल 210 किमीचा वेग पकडला होता. 

अल्टो आणि वॅगन आरवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनी अन्य कंपन्यांच्या कारना विजेवर चालविण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहे. या कंपनीची सध्या दर महिन्याला 1000 कार रेट्रोफिट करण्याची क्षमता आहे. पुढील वर्षी हा आकडा 5000 करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारMaruti Suzukiमारुती सुझुकीMaruti Suzuki e-Survivorमारुती सुझुकी फ्यूचर एस कन्सेप्टcarकार