शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

Airbag : कारमध्ये पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य; 1 एप्रिलपासून लागू होणार नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:44 IST

Car Airbag : 1 एप्रिल 2021 पासून, तयार केलेल्या नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणं आवश्यक असेल.

नवी दिल्ली - कारमधील पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी आता एअरबॅग (Airbags) अनिवार्य करण्यात आल्या आहेत. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एअरबॅग अनिवार्य करण्याच्या तरतूदीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवेदनात वाहनांमध्ये ड्रायव्हरसाठी आणि त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा एक महत्त्वाचा सुरक्षा उपाय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने त्याबाबत सूचना केली होती असं म्हटलं आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2021 पासून, तयार केलेल्या नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणं आवश्यक असेल. जुन्या वाहनांच्या संदर्भात, 31 ऑगस्ट 2021 पासून सध्याच्या मॉडेल्समध्ये ड्रायव्हरच्या सीटसह एअरबॅग देणं बंधनकारक असेल. अपघातप्रसंगी या एअरबॅग प्रवशांचा जीव वाचवतील. दरम्यान, नवीन नियम लागू झाल्याने वाहनांच्या किंमती कमीत कमी 5000-7000 रुपयांनी वाढतील असा अंदाज आहे. याआधी 29 डिसेंबर 2020 रोजी सरकारने सांगितले होते की, 1 एप्रिल 2021 पासून नवीन वाहनांसाठी आणि 1 जून 2021 पासून जुन्या वाहनांसाठी डबल एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जुन्या वाहनांमध्ये एअरबॅगची मुदत तीन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात आली आहे.

एअरबॅग किती वेगाने उघडते? कसे काम करते? जाणून घ्या...

कारमधून प्रवास करणारे प्रवासी एखाद्या अपघाताला सामोरे गेले तर त्यांना कमीतकमी दुखावत व्हावी आणि प्राण वाचावेत असा यामागचा उद्देश आहे. एअरबॅग म्हणजे हवेचा फुगा नसतो तर ती आतमध्ये असताना हवा नसलेल्या पिशवीसारखीच असते. कारच्या स्टेअरिंगमध्ये, डॅशबोर्ड आणि पॅसेंजरच्या बाजुला एअरबॅग बसवलेल्या असतात. जेव्हा कधी अपघात होतो तेव्हा ही एअरबॅग तब्बल 350 किमी प्रति तासाच्या वेगाने उघडते. कारचा वेग यासाठी विचारात घेतला जातो. 

जेव्हा कारचा वेग 30 ते 40 किमीपेक्षा जास्त असतो तेव्हा या एअरबॅग उघडतात. ही वेगमर्यादा वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी असू शकते. अपघातावेळी ठोकर लागल्याचक्षणी एअरबॅग उघडली तरच आतील व्यक्ती वाचू शकते. यामुळे ही एअरबॅग अवघ्या काही सेकंदांच्या काही भागात कार्यरत होऊन त्यात हवा भरली जाणे गरजेचे असते. यासाठी कारला सेन्सर लावलेले असतात. या सेन्सरला आघात झाल्याचे जाणवल्यास सेकंदाच्या चौथ्या भागात एअरबॅगला सूचना दिली जाते. यानंतर 350 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने ही एअरबॅग उघडते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :carकारIndiaभारत