शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Ethanol मुळे इंजिन आणि मायलेजवर खरंच परिणाम पडतो? काय आहे सरकारचे धोरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:45 IST

भारतात मागील दोन वर्षांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर झपाट्याने वाढत आहे.

ऑटो कंपन्यांनी E20 वाहने लॉन्च करण्यास सुरुवात केल्याने भारतात एप्रिल २०२३ नंतर इथेनॉल-मिश्रित पेट्रोलचा वापर झपाट्याने वाढू लागला आहे. ऑटो कंपन्यांनी सरकारच्या ग्रीन फ्युअल धोरणाचे आणि E20 इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले असले तरी, आता लोकांनी E20 इंधनाबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारचे स्पष्टीकरणअसा दावा केला जातोय की, E20 इंधनामुळे वाहनाचे मायलेज आणि इंजिनला हानी पोहोचवू शकते. याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले की, E20 म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये नियमित पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा घनता आहे, म्हणूनच मायलेजमध्ये थोडा फरक पडू शकतो. सरकारने हे देखील स्पष्ट केले की, E20 मुळे तुम्हाला १-२ टक्के कमी मायलेज मिळेल, पण इंजिन ट्यूनिंगच्या मदतीने तुम्ही यात सुधारणा करू शकता.

इंजिनला धोका नाहीसरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधनामुळे पर्यावरणाला फायदा झाला आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) नुसार, E20 साठी डिझाइन केलेली वाहने एप्रिल २०२३ पासून भारतात उपलब्ध आहेत. ही वाहने इथेनॉल मिश्रण हाताळण्यासाठी अपग्रेडेड इंधन प्रणालीसह येतात. सुझुकी, रॉयल एनफील्ड, टीव्हीएस मोटर आणि होंडा सारख्या अनेक मोठ्या कंपन्या E20 सुसंगत वाहने विकतात.

इथेनॉल पर्यावरणपूरक आहे का?नीति आयोगाच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, उसापासून तयार होणारे इथेनॉल पेट्रोलच्या तुलनेत ६५ टक्के कमी CO₂ उत्सर्जित करते, तर मक्यावर आधारित इथेनॉल उत्सर्जन सुमारे ५० टक्के कमी करते. म्हणूनच इथेनॉल मिश्रण भारताच्या हवामान कृती धोरणाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

इथेनॉलबाबत सरकारची भूमिकाE20 च्या यशानंतर, सरकार आता E27 (२७ टक्के इथेनॉल असलेले पेट्रोल) सादर करण्याची योजना आखत आहे. मानके तयार केली जात आहेत आणि ऑगस्टच्या अखेरीस ती अंतिम केली जातील. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) E27 सुसंगततेसाठी इंजिनमधील बदलांचे मूल्यांकन करत आहे. सरकार इथेनॉलकडे एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत म्हणून पाहत आहे आणि त्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहे. इथेनॉलकडे सरकारच्या पावलामुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर कच्च्या तेलाची आयातही कमी होईल. यामुळे भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळेल. तसेच, इथेनॉल उत्पादनासाठी ऊस आणि मका यासारख्या पिकांची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलbikeबाईकcarकारCentral Governmentकेंद्र सरकार