शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कारचा टायर नेहमी लक्षपूर्वक तपासा व योग्यवेळी बदलूनही घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:00 IST

टायर ही कारच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब, टायर नसेल तर कारला काहीच अर्थ नाही. या टायरची निगा राखणे व तपासणी नेहमी करणे हे म्हणूनच अतिशय गरजेचे आहे.

ठळक मुद्देचक्राचा शोध लागल्यानंतर टायरसारख्या एका महत्त्वाच्या घटकानेही क्रांतीच घडवून आणलेली आहेअगदी विमानासाठीही टायर वापरले जातात, यातच टायरची महती खरे म्हणजे लक्षात येतेतुमची कार जितकी वापराल म्हणजेच टायरचा जितका वापर कराल तेवढे चांगले असते

टायर ही कार वा कोणत्याही वाहनासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. टायरशिवाय कार चालवणे कसे असेल, याचा विचारही आज करू शकत नाही. याच टायरमुळे आपल्या वाहनाचा समतोल राखला जातो, ड्रायव्हिंगमध्ये सुलभपणा जाणवतो, सुरक्षितता येते अशा बऱ्याच बाबी या टायरशी निगडित असतात. जर टायर नीट नसेल तर काय होईल, याचा विचारही खरे म्हणजे करवणार नाही. टायरशिवया कार व्यर्थ आहे, असेच म्हणावे लागते.विविध प्रकारच्या रस्त्यावरून, पृष्ठभागावरून तुमची कार सुरक्षितपणे व तुम्हाला किमान त्रास होईल, अशा प्रकारे वहन करणारा टायर हा अतिशय मोलाचा आहे.

आज विविध पद्धतीचे टायर विकसित झाले आहेत. केवळ रबर नाही, तर अन्य काही घटकांनीही टायर तयार करून तुमच्यापुढे आणले गेलेले आहेत. चक्राचा शोध लागल्यानंतर टायरसारख्या एका महत्त्वाच्या घटकानेही क्रांतीच घडवून आणलेली आहे. सर्व प्रकारच्या रस्त्यावरील वाहनांनाच नव्हे तर अगदी विमानासाठीही टायर वापरले जातात, यातच टायरची महती खरे म्हणजे लक्षात येते.

मोटारीला कोणत्या प्रकारचे टायर मोटार कंपन्याकडून दिले जातात, त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे व कोणत्या दर्जाचे टायर बसवता, त्यासाठी रीम कोणत्या प्रकारचे वापरता हा प्रत्येक वापरकर्त्याचा वैयक्तिक आवडीनिवडीचा व पर्यायाचा भाग आहे. अर्थात बसवलेल्या टायरची योग्य ती देखभाल व करणे गरजेचे आहे. टायर ही काही कायम स्वरूपात टिकणारी गोष्ट नाही, तुम्ही जितका त्या टायरचा वापर कराल, जितक्या प्रकाराने त्याची हाताळणी कराल तितके त्याचे आयुष्य कमी अधिक होत असणार आहे. एका ठरावीक कालमर्यादेनंतर तो खराब होतो, त्यासाठी तुम्ही त्या टायरचा वापर किती कसा करता, हे देखील अवलंबून नसते.

कार न वापरता बराच काळ ठेवल्यानेही टायरवर परिणाम होत असतो, त्याच्यावर उन्हापावसाचा, वातावरणाचा परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमची कार जितकी वापराल म्हणजेच टायरचा जितका वापर कराल तेवढे चांगले असते. टायर वापरताना रस्ते कसे आहेत, तेथे कशी कार चालवावी, टायरवर असणारे डिझाईन म्हणजे नेमके काय सांगणारे असते, ते खराब झाले, त्या टायरला कट गेला, त्याला भेगा पडल्या, त्या टायरला पंक्चरमुळे खूप नुकसान सहन करावे लागले आहे का, अशा विविध बाबीं सातत्याने टायरबाबत नजरेखाली घातल्या गेल्या पाहिजेत. सर्वसाधारणपणे भारतात कारच्या टायरचे आयुष्य हे ३० हजार किलोमीटरपर्यंत असते.

येथील रस्ते, हवामान याचा विचार करण्याबरोबरच टायरमध्ये तुम्ही हवेचे प्रमाण योग्य ठेवणे अतिशय गरजेचे असते. किंबहुना दररोज टायरची हवा तपासणे, कमी असल्यास भरणे, जास्त असल्यास कमी करणे, व्हॉल्व चांगला आहे की नाही, ट्यूब असेल तर चांगली आहे की नाही, हे ही तपासणे आवश्यक असते. टायरचे योग्य रोटेशन व त्याचा कमाल वापर कसा करावा ते अन्य लेखात पाहू. पण टायरची निगा प्रत्येकाने नीट राखणे, त्याची तपासणी करणे या सर्वात महत्त्वाच्या बाबी तुम्ही केल्याच पाहिजेत. किंबहुना तुमच्या सुरक्षित प्रवासामधील ते एक गमक आहे, हे लक्षात ठेवा.

 

टॅग्स :Automobileवाहनcarकार