शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

कारचा टायर नेहमी लक्षपूर्वक तपासा व योग्यवेळी बदलूनही घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:00 IST

टायर ही कारच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब, टायर नसेल तर कारला काहीच अर्थ नाही. या टायरची निगा राखणे व तपासणी नेहमी करणे हे म्हणूनच अतिशय गरजेचे आहे.

ठळक मुद्देचक्राचा शोध लागल्यानंतर टायरसारख्या एका महत्त्वाच्या घटकानेही क्रांतीच घडवून आणलेली आहेअगदी विमानासाठीही टायर वापरले जातात, यातच टायरची महती खरे म्हणजे लक्षात येतेतुमची कार जितकी वापराल म्हणजेच टायरचा जितका वापर कराल तेवढे चांगले असते

टायर ही कार वा कोणत्याही वाहनासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. टायरशिवाय कार चालवणे कसे असेल, याचा विचारही आज करू शकत नाही. याच टायरमुळे आपल्या वाहनाचा समतोल राखला जातो, ड्रायव्हिंगमध्ये सुलभपणा जाणवतो, सुरक्षितता येते अशा बऱ्याच बाबी या टायरशी निगडित असतात. जर टायर नीट नसेल तर काय होईल, याचा विचारही खरे म्हणजे करवणार नाही. टायरशिवया कार व्यर्थ आहे, असेच म्हणावे लागते.विविध प्रकारच्या रस्त्यावरून, पृष्ठभागावरून तुमची कार सुरक्षितपणे व तुम्हाला किमान त्रास होईल, अशा प्रकारे वहन करणारा टायर हा अतिशय मोलाचा आहे.

आज विविध पद्धतीचे टायर विकसित झाले आहेत. केवळ रबर नाही, तर अन्य काही घटकांनीही टायर तयार करून तुमच्यापुढे आणले गेलेले आहेत. चक्राचा शोध लागल्यानंतर टायरसारख्या एका महत्त्वाच्या घटकानेही क्रांतीच घडवून आणलेली आहे. सर्व प्रकारच्या रस्त्यावरील वाहनांनाच नव्हे तर अगदी विमानासाठीही टायर वापरले जातात, यातच टायरची महती खरे म्हणजे लक्षात येते.

मोटारीला कोणत्या प्रकारचे टायर मोटार कंपन्याकडून दिले जातात, त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे व कोणत्या दर्जाचे टायर बसवता, त्यासाठी रीम कोणत्या प्रकारचे वापरता हा प्रत्येक वापरकर्त्याचा वैयक्तिक आवडीनिवडीचा व पर्यायाचा भाग आहे. अर्थात बसवलेल्या टायरची योग्य ती देखभाल व करणे गरजेचे आहे. टायर ही काही कायम स्वरूपात टिकणारी गोष्ट नाही, तुम्ही जितका त्या टायरचा वापर कराल, जितक्या प्रकाराने त्याची हाताळणी कराल तितके त्याचे आयुष्य कमी अधिक होत असणार आहे. एका ठरावीक कालमर्यादेनंतर तो खराब होतो, त्यासाठी तुम्ही त्या टायरचा वापर किती कसा करता, हे देखील अवलंबून नसते.

कार न वापरता बराच काळ ठेवल्यानेही टायरवर परिणाम होत असतो, त्याच्यावर उन्हापावसाचा, वातावरणाचा परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमची कार जितकी वापराल म्हणजेच टायरचा जितका वापर कराल तेवढे चांगले असते. टायर वापरताना रस्ते कसे आहेत, तेथे कशी कार चालवावी, टायरवर असणारे डिझाईन म्हणजे नेमके काय सांगणारे असते, ते खराब झाले, त्या टायरला कट गेला, त्याला भेगा पडल्या, त्या टायरला पंक्चरमुळे खूप नुकसान सहन करावे लागले आहे का, अशा विविध बाबीं सातत्याने टायरबाबत नजरेखाली घातल्या गेल्या पाहिजेत. सर्वसाधारणपणे भारतात कारच्या टायरचे आयुष्य हे ३० हजार किलोमीटरपर्यंत असते.

येथील रस्ते, हवामान याचा विचार करण्याबरोबरच टायरमध्ये तुम्ही हवेचे प्रमाण योग्य ठेवणे अतिशय गरजेचे असते. किंबहुना दररोज टायरची हवा तपासणे, कमी असल्यास भरणे, जास्त असल्यास कमी करणे, व्हॉल्व चांगला आहे की नाही, ट्यूब असेल तर चांगली आहे की नाही, हे ही तपासणे आवश्यक असते. टायरचे योग्य रोटेशन व त्याचा कमाल वापर कसा करावा ते अन्य लेखात पाहू. पण टायरची निगा प्रत्येकाने नीट राखणे, त्याची तपासणी करणे या सर्वात महत्त्वाच्या बाबी तुम्ही केल्याच पाहिजेत. किंबहुना तुमच्या सुरक्षित प्रवासामधील ते एक गमक आहे, हे लक्षात ठेवा.

 

टॅग्स :Automobileवाहनcarकार