शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

आजपासून १७ गाड्या होणार बंद; आरडीईचे नवे नियम लागू झाल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 09:35 IST

१ एप्रिल २०२३पासून भारतीय वाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई)चे नवीन उत्सर्जन नियम लागू होतील.

मुंबई : १ एप्रिल २०२३ नंतर भारतीयकार बाजारात १७ कार बंद होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक होंडाच्या ५, महिंद्राच्या ३, ह्युंदाई आणि स्कोडाच्या २-२ कार, रेनो, निसान, मारुती सुझुकी, टोयोटा आणि टाटा यांच्या प्रत्येकी एक कारचा समावेश आहे. यातील बहुतेक गाड्या  डिझेलच्या आहेत.

१ एप्रिल २०२३पासून भारतीयवाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई)चे नवीन उत्सर्जन नियम लागू होतील. हे नियम लागू होताच, कार उत्पादकांना त्यांच्या कारचे इंजिन अपडेट करावे लागतील किंवा ते बंद करावे लागतील. नवीन नियमांमुळे उत्सर्जन मानके कंपन्यांना पाळावी लागणार असून, त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

ग्राहकांवर पडणार बोजा

वाहनांना नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी, विद्यमान मॉडेल्सची इंजिने अपडेट करावी लागतील. त्यामुळे कंपन्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत.  २०२० मध्ये बीएस ६ इंजिनमुळे कारच्या किमती ५० ते ९० हजार, तर दुचाकींच्या किमती ३ ते १० हजार रुपयांनी वाढल्या होत्या. आताही कंपन्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहेत.

ह्युंदाई माेटर्सने केली सुरुवात

केंद्र सरकार कठोर असल्याने ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या आय-२० कारचे डिझेल व्हेरियंट आधीच बंद केले आहे. याआधी टोयोटा आणि फोक्सवॅगननेही त्यांच्या डिझेल कार बंद करण्याची घोषणा केली आहे.

गाडीमध्ये बदल करावे लागणार

वाहनांच्या आरडीईनुसार, बीएस६ फेज-२ नियम १ एप्रिलपासून लागू होतील. अशा परिस्थितीत, या वाहनांना आरडीई मानदंडांची पूर्तता करणे कठीण होईल आणि कार निर्मात्या कंपन्यांना वाहनांची विक्री थांबवावी लागेल.

टॅग्स :carकारIndiaभारतAutomobileवाहन