शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

1 लाख 80 हजार गाड्या मारुती बाेलावणार परत; सुरक्षेसंबंधी त्रुटी असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:37 IST

माेफत दुरुस्ती करून देणार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात माेठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने १ लाख ८० हजाराहून अधिक वाहने परत मागविण्याची घाेषणा केली. या गाड्यांमध्ये सुरक्षेसंबंधी संभाव्य त्रुटीचा तपास करून ती दूर करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने पेट्राेलवर चालणारी आहेत.  

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०१८ ते २७ ऑक्टाेबर २०२० या कालावधीत उत्पादन केलेल्या १ लाख ८१ हजार ७५४ गाड्या परत मागविण्यात येणार आहेत. त्यात सियाझ, एर्टिगा, व्हिटारा ब्रीझा, एस-क्राॅस आणि एक्सएल-६ या माॅडेल्सचा त्यात समावेश आहे. या गाड्यांमध्ये सुरक्षेसंबंधी काही त्रुटी आढळून आल्या आहेत. तपासणी केल्यानंतर परिणाम झालेले सर्व सुटेभाग माेफत बदलून देण्यात येतील. याबाबत कंपनीच्या अधिकृत वर्कशाॅपमधून ग्राहकांना संपर्क करण्यात येईल. 

नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू हाेईल, असे कंपनीने म्हटले आहे. ताेपर्यंत ग्राहकांनी पाणी भरलेल्या ठिकाणी प्रवास करू नये, असे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्राॅनिक भागावर पाणी पडणार याची काळजी घेण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे. सेमिकंडक्टर चीपचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे वाहन उत्पादनावर माेठा परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये सर्वच कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम हाेण्याची शक्यता असून, मारुती सुझुकीला या दुरुस्तीमुळे दुहेरी फटका बसणर आहे. 

आपली गाडी या यादीत आहे का, याची ग्राहक स्वत:देखील माहिती घेऊ शकतात. त्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर संबंधित माॅडेलच्या लिंकवर जाऊन चेसिस नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध हाेईल. चेसिस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड असताे. तसेच वाहनाचे बिल आणि नाेंदणीच्या कागदपत्रांमध्येदेखील नमूद केलेला असताे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन