शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

युवकांनी सोशल मीडियापेक्षा आपली कला वृद्धिंगत करावी - सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 11:29 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देयुवा महोत्सवचे थाटात उद्घाटन

अमरावती : युवा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. मानवी संसाधने आपल्या देशात अधिक आहेत. युवकांचा आय.क्यू. जुन्या पिढीपेक्षा अधिक आहे, असे असताना आमचे युवक सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करीत असून, त्यावर मर्यादा घालून आपल्यातील कला वृद्धिंगत कराव्यात, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी येथे केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. भारताचा विकास नवीन पिढीच्या खांद्यावर आहे. तंत्रज्ञानाने भारतात क्रांती केली असून, त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या देशात होत आहे. विद्यापीठ स्तरावर टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा, याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातील, असे केदार म्हणाले.

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी विद्यापीठातून दरवर्षी एक लाख विद्यार्थ्याांपैकी ४० हजार विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात आणि ६० हजार विद्यार्थ्यांना पदवी मिळत नाही. ६० हजारांचा आकडा कमी होण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सी.बी.सी.एस.) पद्धत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी केले. यावेळी मागील वर्षी शासकीय विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेने उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तेथील डॉ. सुधीर मोहोड व डॉ. विनोद गावंडे यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन ना. केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले, तर आभार डॉ. संजीव ईश्वरकर यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षणSunil Kedarसुनील केदारStudentविद्यार्थी