शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

यंदा नैसर्गिक आपत्तीचे १९ बळी

By admin | Published: August 09, 2016 12:14 AM

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने ३१ जणांचा बळी गेला. ६ जण गंभीर झालेत, तर १,२८४ घरांची पडझड झाली व १,२२३ कुटुंबे बाधित झाली आहेत.

३१ जनावरे मृत : १,२२३ कुटुंबे बाधित, १२८८ घरांची पडझडअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने ३१ जणांचा बळी गेला. ६ जण गंभीर झालेत, तर १,२८४ घरांची पडझड झाली व १,२२३ कुटुंबे बाधित झाली आहेत.यंदाच्या पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर येणे, वीज पडणे, अंगावर भिंत पडणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये ३१ जणांना जीव गमवावा लागला. या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील ८६ गावे बाधित झालीत. यामध्ये १,२२३ नागरिकांना आपत्तीची झळ पोहोचली. घरात पाणी शिरल्याने या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. ६ व्यक्ती गंभीर जखमी झाले तर १,२८८ घरांची पडझड झाली. २० जनावरे पुरात वाहून गेलीत. ८ वीज पडून ठार तर ३ जनावरांचा गोठ्याची भिंत पडून मृत्यू झाला आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाल्याकाठालगतची ३,७२७ हेक्टर जमीन खरडून गेली. शेतात पाणी साचल्याने ८ हजार हेक्टरमधील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४६५ मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ७०३.३ मि.मी. पाऊस पडला. याची १५१.३ एवढी टक्केवारी आहे. सर्व तालुक्यांनी सद्यस्थितीत पावसाची सरासरी पार केली आहे. यंदा ३२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली असल्याने नुकसानीचा आकडा वाढला आहे.यंदा सुरूवातीच्या काळात पाऊस बेपत्ता होता. नंतरच्या काळात मात्र, पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला. परिणामी पूरामुळे अनेकांचे बळी गेले. तसेच अनेकांची वित्तीय हानी देखील झाली. परंतु शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)वार्षिक सरासरीच्या ८६.४ टक्के पाऊसजिल्ह्यात वार्षिक ८१४.५ मि. मी. सरासरीच्या तुलनेत दोन महिन्यात आतापर्यंत ७०३.३ मि. मी. पाऊस पडला. यामध्ये मोर्शी १०८.९ टक्के, अचलपूर १०८ टक्के, दर्यापूर १०९ टक्के, अंजनगाव १०१.३ टक्के या तालुक्यात वार्षिक सरासरीईतका पाऊस पडला आहे.