शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

यशोमती बरसल्या जिल्हाधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:28 IST

तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा मुद्दा तापला : परिणामास प्रशासन जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासमक्ष पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी गुरुवारी प्रशासनाला दिल्या.तिवसा विधानसभा मतदारसंघात तिवसा, भातकुली, अमरावती आणि मोर्शी तालुक्यातील काही गावे येतात. बहूतांश गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, चार ते आठ दिवआड पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत आहे. मोठ्या प्रमाणात हातपंप बंद असूनस विहीर खोलीकरणाची आवश्यकता आहे तसेच बोअरवेलची मागणीदेखील आहे. विहीर अधिग्रहण गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तीव्र पाणीटंचाई आहे, अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. पुढील मे आणि जून महिन्यात ही समस्या अधिक तीव्र होईल. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा विभागाने कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु, याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी सुनावले. जिल्हाधिकाºयांनी जी कामे मंजूर आहेत, ती तातडीने मार्गी लावावीत. टँकरची मागणी असेल, तर तात्काळ सुरू करावे. विहीर अधिग्रहणाची कार्यवाही करावी. कूपनलिका घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषद व मजीप्रा कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी दिल्या. यावेळी झेडपी बांधकाम सभापती जयंत देशमुख, सदस्य अलका देशमुख, मुकुंद देशमुख, नराध्यक्ष वैभव वानखडे, हरिभाऊ मोहोड, बबलू मक्रमपुरे, विद्या बोडखे, रंजना पोजगे, लुकेश केने, संदीप आमले, रवी राऊत, रमेश काळे, नितीन डहाणे, पवन काळमेघ, गजानन ढवळी, पंकज देशमुख, अतुल यावलीकर, वैभव काकडे, प्रशांत टाकरखेडे, विरेंद्र जाधव, मधूकर भगत, सारिका दापूरकर तसेच विविध गावांतील नागरिक उपस्थित होते.अप्पर वर्धा धरणातील पाणी सोडादुष्काळी परिस्थितीमुळे भूजलस्तर खालावला आहे. परिणामी नागरिकांना तसेच पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला एकदा तरी पाणी सोडावे, जेणेकरून या भागातील पाण्याची खालावलेली पातळी वाढण्यास मदत होईल, पशुधनालाही पिण्याचे पाणी मिळेल, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला. यावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सकात्मक असल्याचे दर्शविले.चारा छावण्या सुरू का नाहीत?दुष्काळी परिस्थितीचा सामना सर्व घटकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात चारा छावण्या सुरू केल्या. मात्र, जिल्ह्यात अजूनपर्यंत चारा छावणीचे नियोजन नाही. प्रशासनाने वैरण बियाणे वाटप केले असले तरी पाणी नसल्याने पिकेल कसे, असा प्रश्न जिल्हाधिकाºयांसमोर आ. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. यावर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरcollectorजिल्हाधिकारी