शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यशोमती बरसल्या जिल्हाधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:28 IST

तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा मुद्दा तापला : परिणामास प्रशासन जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासमक्ष पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी गुरुवारी प्रशासनाला दिल्या.तिवसा विधानसभा मतदारसंघात तिवसा, भातकुली, अमरावती आणि मोर्शी तालुक्यातील काही गावे येतात. बहूतांश गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, चार ते आठ दिवआड पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत आहे. मोठ्या प्रमाणात हातपंप बंद असूनस विहीर खोलीकरणाची आवश्यकता आहे तसेच बोअरवेलची मागणीदेखील आहे. विहीर अधिग्रहण गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तीव्र पाणीटंचाई आहे, अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. पुढील मे आणि जून महिन्यात ही समस्या अधिक तीव्र होईल. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा विभागाने कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु, याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी सुनावले. जिल्हाधिकाºयांनी जी कामे मंजूर आहेत, ती तातडीने मार्गी लावावीत. टँकरची मागणी असेल, तर तात्काळ सुरू करावे. विहीर अधिग्रहणाची कार्यवाही करावी. कूपनलिका घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषद व मजीप्रा कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी दिल्या. यावेळी झेडपी बांधकाम सभापती जयंत देशमुख, सदस्य अलका देशमुख, मुकुंद देशमुख, नराध्यक्ष वैभव वानखडे, हरिभाऊ मोहोड, बबलू मक्रमपुरे, विद्या बोडखे, रंजना पोजगे, लुकेश केने, संदीप आमले, रवी राऊत, रमेश काळे, नितीन डहाणे, पवन काळमेघ, गजानन ढवळी, पंकज देशमुख, अतुल यावलीकर, वैभव काकडे, प्रशांत टाकरखेडे, विरेंद्र जाधव, मधूकर भगत, सारिका दापूरकर तसेच विविध गावांतील नागरिक उपस्थित होते.अप्पर वर्धा धरणातील पाणी सोडादुष्काळी परिस्थितीमुळे भूजलस्तर खालावला आहे. परिणामी नागरिकांना तसेच पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला एकदा तरी पाणी सोडावे, जेणेकरून या भागातील पाण्याची खालावलेली पातळी वाढण्यास मदत होईल, पशुधनालाही पिण्याचे पाणी मिळेल, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला. यावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सकात्मक असल्याचे दर्शविले.चारा छावण्या सुरू का नाहीत?दुष्काळी परिस्थितीचा सामना सर्व घटकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात चारा छावण्या सुरू केल्या. मात्र, जिल्ह्यात अजूनपर्यंत चारा छावणीचे नियोजन नाही. प्रशासनाने वैरण बियाणे वाटप केले असले तरी पाणी नसल्याने पिकेल कसे, असा प्रश्न जिल्हाधिकाºयांसमोर आ. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. यावर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरcollectorजिल्हाधिकारी