शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची चुकीची कामे, चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST

अमरावती: मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील गत काही वर्षांत काही गावांत करण्यात आलेल्या चुकीच्या कामांमुळे पाणीटंचाईची समस्या डोके ...

अमरावती: मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील गत काही वर्षांत काही गावांत करण्यात आलेल्या चुकीच्या कामांमुळे पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत असल्याने सोमवारी जिल्हा परिषदेची ऑनलाईन सभा या विषयावर चांगली गाजली. दरम्यान, यासंदर्भात अध्यक्ष बबलू देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरवर्षी मेळघाटातील काही गावात उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून टंचाईग्रस्त गावांत उपापयोजना केल्या जातात. मात्र, उपाययोजना करताना संबंधित गावातील पाणीस्त्रोत असताना याऐवजी दुसऱ्या गावातील जलस्त्रोतामधून पाणीपुरवठ्याकरिता पाच किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकण्यात आल्याचा मुद्दा सभापती दयाराम काळे यांनी सभेत उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी धारणी तालुक्यातील टिटंबा व सावऱ्या या दोन्ही गावांत पाणीस्त्रोत आहेत. मात्र, संबंधित गावातील स्त्रोतावरून पाणीपुरवठा न करता टिटंब्याला सावऱ्यावरून आणि सावऱ्याला टिटंब्यावरून पाणीपुरवठ्याकरिता पाईपलाईन टाकण्यात आली. तेही जवळचे सोडून दूरवरून पाईपलाईन टाकण्यामागील पाणीपुरवठा विभागाचा उद्देश काय, असा सवाल करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याशिवाय कारदा ते गांगखेडा,कोयलारी ते पाचडोंगरी या गावांना डोमा गावावरून पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली असताना वरील गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. झापल ग्रामपंचायत क्षेत्रातील बारूगाव आणि भुलोरी या ठिकाणीही पाणीटंचाईची कामे केली मात्र याचा फायदा झाला नाही. परिणामी टंचाईची समस्या आतापासूनच भेडसावत आहे. मेळघाटातील पाणीपुरवठ्याच्या कामांची पदाधिकाऱ्यांनी मांडलेली अवस्था ऐकून अध्यक्षांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश सीईओंना दिले आहेत. याशिवाय सायन्सस्कोअर मैदानाचे काम सिमेंट, विटामध्ये केले आहे. सदर काम विटामध्ये करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले असताना ते काम थांबविले का नाही,सदर काम किती टक्के झाले आहे. याबाबतचा अहवाल अध्यक्षांनी मागविला आहे. तोपर्यंत देयके देवू नयेत अशी बांधकाम विभागाला सूचना दिली आहे. यावेळी सभेला अध्यक्ष बबलू देशमुख,उपाध्यक्ष विठ्ठल चव्हान, सभापती बाळासाहेब हिंगणीकर,दयाराम काळे, सदस्य रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे, प्रताप अभ्यंकर, नितीन गोंडाणे, शरद मोहोड, प्रकाश साबळे, राजेंद्र बहूरूपी, सीईओ अमोल येडगे, डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.

बॉक्स

बांधकामच्या अधिकाऱ्यांना सुनावले

समृध्दी महामार्गाच्या कामामुळे धामणगाव,चांदूर रेल्वे,नांदगाव तालुक्यांतील अनेक गावांना जोडणारे झेडपीच्या मालकीचे रस्ते खराब झाले आहेत. मात्र, या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत बांधकाम विभागाने तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी बांधकाम विभागाला दिले होते. मात्र, हा अहवाल सादर करण्यात न आल्याने कार्यकारी अधिकारी अभियंत्यांना सुनावत तातडीने अहवाल सादर करण्याचे पुन्हा निर्देश दिले आहेत.