शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

वनजमिनींची कार्य आयोजना गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:13 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनजमिनींचा वापर करावयाचा असल्यास अगोदर कार्य आयोजना मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ताब्यातील ४५ लाख हेक्टर वनजमिनींबाबत गेल्या ३७ वर्षांपासून कार्य आयोजना मंजूर करण्यात आली नाही. वन संज्ञेतील ही जमीन असूनही याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार अनभिज्ञ : महसूलच्या ताब्यातील वनजमिनी बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनजमिनींचा वापर करावयाचा असल्यास अगोदर कार्य आयोजना मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ताब्यातील ४५ लाख हेक्टर वनजमिनींबाबत गेल्या ३७ वर्षांपासून कार्य आयोजना मंजूर करण्यात आली नाही. वन संज्ञेतील ही जमीन असूनही याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे.२५ आॅक्टोबर १९८० रोजी वनसंवर्धन कायदा अस्तित्वात आला. परिणामी वनजमिनींचा वापर करताना कार्य आयोजना मंजूर करणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २०२/९५ आणि १७१/९६ टी.एन. गोदावरन प्रकरणी निकाल देताना मंजूर कार्य आयोजनेनुसार वनजमिनींवर कामे झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिलेत. ही बाब अन्य विभागांच्या ताब्यात असलेल्या वन संज्ञेतील सर्व जमिनींना लागू करण्यात आली. परंतु, राज्यातील महसूल विभागाच्या ताब्यात ३३.५ लक्ष स्क्रब जमीन, तर १२ लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत (नोटीफाईड) अशी ४५.५० लाख हेक्टर वन संज्ञेतील जमीन आहे. मात्र, वनविभाग मालकीच्या या जमिनींचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य आयोजना मंजूर करून घेतली नाही. त्यामुळे महसूल विभागाने गेल्या ३७ वर्षांत या वनजमिनींची उत्पादकता रसातळाला नेल्याचे वास्तव आहे. वनसंवर्धन कायदा १९८० नियम १९८१ व २००३ नुसार प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक यांना महसूल अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार प्रदान केले आहे. तथापि, या अधिकाराचा कोणत्याही वनाधिकाºयाने वापर केलेला नाही. त्यामुळे महसूल विभागाने विविध वापराच्या नावे घेतलेल्या वनजमिनींबाबत राज्य शासनदेखील ‘सायलेंट झोन’मध्ये असल्याचे दिसून येते. वनजमिनींचे कार्य आयोजना मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. परंतु, वनविभागाने ’महसूल’च्या ताब्यातील जमिनींबाबतचा प्रस्ताव पाठविला नाही.महसूल, पोलीस अधिकारीसुद्धा दोषीभारतीय वन अधिनियम १९२७ कलम ६६ नुसार भारतीय वनसेवेच्या अधिकाºयांनी महसूल अधिकाºयांना वनगुन्हे रोखण्यासाठी परावृत्त करणे गरजेचे होते. याशिवाय कलम ७९ नुसार याप्रकरणी महसूल व पोलीस अधिकाºयांनी वनाधिकाºयांना सहकार्य आणि साहाय्य करणे बंधनकारक केले आहे. याची जाणीव असताना अस्तित्वात असलेल्या वनकायद्यातील तरतुदींचे पालन करून महसूल अधिकाºयांविरुद्ध वनगुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. मात्र, महसूल आणि पोलीस अधिकारी यांनी हा विषय बेदखल केला आहे.प्रधान वनसचिवसुद्धा हतबलमहसूलच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी राज्याचे प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी ८ डिसेंबर २०१६ रोजी शासनादेश काढला. ३१ मार्च २०१७ पर्यंत वनजमिनी परत करा, असा फतवा जारी केला. मात्र, प्रधान वनसचिव खारगे हे महसूलच्या लॉबीपुढे हतबल झाले. दोन वर्षांच्या कालावधी झाला असताना इंचभरही वनजमीन ते परत घेऊ शकले नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: लक्ष देऊन वनजमिनी परत मिळवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.