शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अमरावतीतील ३१४ ग्रामपंचायतींमध्ये पाच वर्षे असणार महिलाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:26 IST

Amravati : ७ व ८ जुलै रोजी ग्रा.पं. निहाय काढणार सोडत, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामविकास विभागाने १७ जूनला जाहीर केलेल्या सुधारित सरपंच आरक्षणानुसार अनुसूचित जाती, जमाती, नामाप्र व सर्वसाधारण प्रवर्गात ७२५ ग्रा.पं. मधील महिला राखीव पदांसाठी ७व ८ जुलै आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी निर्गमित केले आहेत. यामध्ये संबंधित तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले, तर एसडीओ हे नियंत्रण अधिकारी राहतील.

याबाबतचे राजपत्र ५ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध झाल्याने पुढील पाच वर्षांकरिता म्हणजेच ४ मार्च २०३० पर्यंत हे आरक्षण कायम राहणार आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांत जिल्ह्यातील किमान ५५० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातच थेट जनतेमधून सरपंच निवडला जाणार आहे. या सरपंचांना कायद्याने अधिक अधिकार बहाल केलेले आहेत. त्यामुळे या पदांसाठी गावागावांत चुरस वाढणार आहे.

जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रात पेसा कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने चिखलदरा व धारणी तालुक्यातील ११६ सरपंच पदे ही अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत येथे यापूर्वीच महिला आरक्षण निश्चित झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील ७२५ ग्रामपंचायतींमध्ये आता ७ व ८ जुलै रोजी महिला आरक्षण सोडत असल्याने प्रशासनासह राजकारणातील हालचाली गतिमान झाल्या आहेत.

आरक्षण सोडत कार्यक्रम७ जुलै रोजी अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, मोर्शी, दर्यापूर व अचलपूर तालुक्यात महिला आरक्षण सोडत होईल. तर ८ जुलै रोजी नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धामणगाव, वरुड, अंजनगाव सुर्जी य चांदूरबाजार तालुक्यात महिला सरपंचपदासाठी ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात येणार आहे. 

विषम संख्येचा महिला आरक्षणाला फायदाजिल्ह्यात ७२५ ग्रामपंचायतींमध्ये ५० टक्के महिला राखीव याप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण निश्चिती होत आहे. यामध्ये ग्रामपंचायतींची संख्या विषम असल्याचा फायदा महिला सरपंचपदाला होत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम १९६४ नुसार हीपदे आरक्षित करण्यात येईल. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmravatiअमरावती