शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

महिला असुरक्षित, पोलीस कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:17 PM

जिल्हा व शहरात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांची हत्या केल्याचे ताजेच उदाहरण आहे.

ठळक मुद्देसंगीता ठाकरे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना निवेदन

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा व शहरात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांची हत्या केल्याचे ताजेच उदाहरण आहे. एसटीच्या महिला वाहकावर चाकूहल्ला झाला, युवतीची छेडखानी, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना, अ‍ॅसिड व चाकूहल्ले होत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा कुठे तरी कमी पडत असल्याचा सवाल राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी बुधवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनातून केला आहे.अमरावती शहरात महिलाविषयक गुन्ह्यात वाढ झाली असून अमरावतीमधील महिला असुरक्षित आहेत. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढतच आहे. पोलीस काही दिवस मोहीम राबवितात. मात्र, काही दिवसांतच पोलिसांकडून मोहीम गुंडाळली जात असल्याचा आरोप संगीता ठाकरेसह पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे. महिलावरील अत्याचार वाढत गेले, तर महिलांना घरातून बाहेर निघणे कठीण होईल, नोकरी करणे किंवा बाहेरील कामे करणे बंद करावे लागेल, अशी स्थिती निर्माण होईल. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक नसल्याचा आरोप संगीता ठाकरे यांनी केला. महिलासंबंधित अत्याचाराच्या कमी करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ व निरंतर कारवाई सुरू ठेवावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष सुचिता वनवे, संगिता देशमुख, कल्पना वानखडे, सारिका बोरकर, वंदना ठाकरे, ममता हुतके, राई देशमुख, सरला इंगळे, छाया कडू, नीलिमा कडू, माधुरी पोल्हाड, नीता वाटाणे, राजकन्या शिंंगराळे, सुषमा बर्वे, मनीषा कहाते आदी उपस्थित होते.शीतल पाटीलची हत्या करणाऱ्यांना अटक केव्हा?अमरावती : शीतल पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला आतापर्यंत का अटक करण्यात आली नाही, असा सवाल भीम आर्मीने पोलीस आयुक्तांना निवेदनातून बुधवारी केला. आरोपी मोकाट फिरत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मीने सीपींकडे केली. यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनीष साठे, राहुल नाईक, शेख अकबर, राजेश वानखडे, मनोज वानखडे, बंटी रामटेके, अनंदा इंगळे, पवन शेंडे, कपील नाईक, उमेश मेश्राम, विक्की वानखेडे, प्रवीण बन्सोड, अभिजित गोंडाणे, प्रितम हिरे, अशोक नंदागवळी, शरद वाकोडे, प्रवीण गजभिये, राजेश भटकर, राहुल भालेराव आदी उपस्थित होते.