शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय शाळांसाठी हवा भरीव निधी

By admin | Updated: April 5, 2015 00:25 IST

ग्रामीण भागातील शासकीय शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. ...

यशोमती ठाकूर : विधान भवनात आग्रही मागणीअमरावती : ग्रामीण भागातील शासकीय शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामीण भागात अनेक शाळा आजही झाडाखाली भरत आहेत. या दृष्टीने शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शाळांची इन्फ्रास्ट्रक्चरकरिता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विधान भवनात केली. जालना जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत बायोमॅट्रिक प्रणालीची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या प्रणालीची अंमलबजावणी संपूर्ण राज्यातही करण्यात यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी यावेळी बोलताना केली. अमरावतीतील विजयमाला देशमुख ग्रामीण शिक्षकांचे प्रशिक्षण घेतात. त्यांच्यासोबत चर्चा करून शिक्षकांचे व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याची मागणीही यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली. बालकांच्या मोफत शिक्षणाचा कायद्याबाबत नेहमीच सदस्य बोलतात. परंतु ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे अद्यापही रिक्त आहेत. शिक्षकांची पदे मंजूर असूनही ती भरली जात नाही. वरिष्ठ स्तरावर त्याला मंजुरी मिळते. परंतु जिल्हास्तरावर मंजुरीकरिता संस्था व शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांना विनवणी करावी लागते. ती कशासाठी करावी लागते हे आपल्याला माहीत नसले तरी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट न घेतल्यास सदर भरतीच रद्द केली जाते. याकडेही ठाकूर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील शाळांवर मोठ्या प्रमाणावर ब्लॉक देण्यात येत होता. परंतु तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांची स्थिती दयनीय झाली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षणासोबतच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरकरिता भरीव निधी देण्याची गरज असल्याचे यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)