शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

निवडणुकीत महायुतीसोबत राहणार का? बच्चू कडूंचं भविष्याबद्दल सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 15:27 IST

राज्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटांत दररोजच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

राज्याच्या राजकारण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलंय. सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पूर्ण झाली आहे. आता, न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. त्यातच, शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगणार असल्याचं दिसून येतेय. आगामी निवडणुकांसाठी तुम्ही भाजप आणि शिंदे गटांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, असा सवाल आमदार कडू यांना विचारला होता. त्यावर, उत्तर देताना बच्चू कडू यांनी इतिहास दाखवत भविष्यावर सूचक विधान केलंय. 

राज्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटांत दररोजच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला असून, शिंदे गट आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावरही टीका केली होती. अनेकदा बच्चू कडूंनाही टार्गेट केलं जात आहे. मात्र, मंत्रीपदाच्या शर्यतीत असतानाही आमदार कडू यांना न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगतेय. त्यातूनच, आगामी निवडणुकीत बच्चू कडू महायुतीत असणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, पुढील १.५ वर्षात काय होईल हेच सांगता येत नाही, असे आमदार कडू यांनी म्हटलंय. 

आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची, नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार त्याचं अजून काहीही ठरलेलं नाही. आगामी काळात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच, पुढच्या दीड वर्षात काय होणार हे काही आताच सांगता येणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले. तीन वेळा शपथविधी झाले. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार हे आताच सांगता येत नाही, असंही कडू यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळ यांनी शिंदे गटाला ऑफर केलेल्या जागांबाबत विचारलं असता, हे विधान त्यांनी चुकून केलं का, भाजपची हीच भूमिका आहे का, हेही तपासलं पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले. 

अंधारे विरुद्ध कडू यांच्यात टीकास्त्र

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार बच्चू कडूंवर प्रहार केला होता. देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या हाताने बच्चू कडूंचा गेम करत आहेत, अशी अंधारे यांनी केली होती. आमचे नाव प्रहार आहे. आम्ही वार करतो. आम्ही फसत नाही. आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो. देवेंद्रजी आम्हाला मदतच करणार आहेत. केवळ एक फोन केला म्हणून कुणी गुवाहाटीला जात नाही, असा पलटवार कडू यांनी केला होता.  

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना