शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव विभागाने जंगलात सोडले दीड कोटी ‘सीड बॉल’, बांबूचे बी रुजविण्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:22 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत.

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वन्यजीव विभागाने दीड कोटींहून अधिक लाडू जंगलात सोडले आहेत. जंगलात सोडलेले लाडू काळ्या मातीचे असून, त्यात बांबू बी टाकले आहे. मनुष्यबळाचा वापर करून हे खास ‘सीड बॉल’ वन्यजीव विभागाने बांधून घेतले. या मातीच्या लाडवातून बांबूचे बी वनक्षेत्रात रुजविण्याचा मेळघाटच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. या मातीच्या लाडवाच्या माध्यमातून जंगलात बांबूची लागवड करण्याचा, जंगलाची घनता वाढविण्याचा, जंगलातील अवघड ठिकाणांसह जंगलात जिथे बांबू नाही, त्या ठिकाणी ते रुजविण्याचा प्रयत्न झाला आहे.

आकोट वन्यजीव विभागात सर्वत्र, गुगामल वन्यजीव विभागातील हरिसाल, तारूबांदा, वैराट तसेच सिपना वन्यजीव विभागात सेमाडोह पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात हे लाडू मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहेत. यात वन्यजीव क्षेत्रातील मानवी वापर कमी करीत कुठलेही खड्डे किंवा खोदकाम न करता बांबू रोपांची लागवड झाली आहे. नर्सरीत बांबू रोप तयार करून त्या पॉलीथीन बॅगमधील बांबू रोपांची जंगल क्षेत्रात नेण्यापर्यंतचा होणारा खर्च टाळण्यात वन्यजीव विभागाला यश आले आहे.

चिकण मातीचे लाडू बांधण्यात चिखलदरा फॉरेस्ट ट्रेनिंग स्कुलच्या प्रशिक्षणार्थींसह गावपातळीवरील वनसमितीचाही सहभाग उल्लेखनीय राहिला. पहिल्या पावसातच हे लाडू फुटलेत अन् जागीच पसरलेत. या पसरलेल्या मातीत त्या बांबू बिया जागेवरच नैसर्गिक वातावरणात उगवल्यात. यातून बांबूची रोपं जंगलात वाढीस लागली. यात बांबू बियांची उगवण क्षमता अधिक राहली असून जवळपास ९० ते ९५ टक्के लाडवातून बांबूच्या रोपट्यांनी जंगलात पाय रोवले आहेत. जंगलातील गवतासोबतच त्यांनीही जागा मिळवली आहे. 

बांबू बियांनी लक्षावधी दिले कमवूनमेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत भवई-भुलोरी जंगल परिसरात ४०४ हेक्टर क्षेत्रातील बांबू १५ ते २० वर्षांत पहिल्यांदाच फुलावर आले. बांबूचे बी ग्रामस्थांनी गोळा केले. २०० रुपये किलो दराने ते भुलोरी ग्रामपंचायतने विकत घेतले. ग्रामपंचायतने हे बी ३०० रुपये किलोने विकले. राज्यातच नव्हे, तर मध्य प्रदेश वनविभागानेही हे बी विकत नेले. यात ग्रामपंचायतीला २३ लाख मिळालेत. मेळघाट वनक्षेत्रातही या बांबू बियांचा वापर केला गेला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती