शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

वन्यजीव विभागाने जंगलात सोडले दीड कोटी ‘सीड बॉल’, बांबूचे बी रुजविण्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:22 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत.

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वन्यजीव विभागाने दीड कोटींहून अधिक लाडू जंगलात सोडले आहेत. जंगलात सोडलेले लाडू काळ्या मातीचे असून, त्यात बांबू बी टाकले आहे. मनुष्यबळाचा वापर करून हे खास ‘सीड बॉल’ वन्यजीव विभागाने बांधून घेतले. या मातीच्या लाडवातून बांबूचे बी वनक्षेत्रात रुजविण्याचा मेळघाटच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. या मातीच्या लाडवाच्या माध्यमातून जंगलात बांबूची लागवड करण्याचा, जंगलाची घनता वाढविण्याचा, जंगलातील अवघड ठिकाणांसह जंगलात जिथे बांबू नाही, त्या ठिकाणी ते रुजविण्याचा प्रयत्न झाला आहे.

आकोट वन्यजीव विभागात सर्वत्र, गुगामल वन्यजीव विभागातील हरिसाल, तारूबांदा, वैराट तसेच सिपना वन्यजीव विभागात सेमाडोह पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात हे लाडू मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहेत. यात वन्यजीव क्षेत्रातील मानवी वापर कमी करीत कुठलेही खड्डे किंवा खोदकाम न करता बांबू रोपांची लागवड झाली आहे. नर्सरीत बांबू रोप तयार करून त्या पॉलीथीन बॅगमधील बांबू रोपांची जंगल क्षेत्रात नेण्यापर्यंतचा होणारा खर्च टाळण्यात वन्यजीव विभागाला यश आले आहे.

चिकण मातीचे लाडू बांधण्यात चिखलदरा फॉरेस्ट ट्रेनिंग स्कुलच्या प्रशिक्षणार्थींसह गावपातळीवरील वनसमितीचाही सहभाग उल्लेखनीय राहिला. पहिल्या पावसातच हे लाडू फुटलेत अन् जागीच पसरलेत. या पसरलेल्या मातीत त्या बांबू बिया जागेवरच नैसर्गिक वातावरणात उगवल्यात. यातून बांबूची रोपं जंगलात वाढीस लागली. यात बांबू बियांची उगवण क्षमता अधिक राहली असून जवळपास ९० ते ९५ टक्के लाडवातून बांबूच्या रोपट्यांनी जंगलात पाय रोवले आहेत. जंगलातील गवतासोबतच त्यांनीही जागा मिळवली आहे. 

बांबू बियांनी लक्षावधी दिले कमवूनमेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत भवई-भुलोरी जंगल परिसरात ४०४ हेक्टर क्षेत्रातील बांबू १५ ते २० वर्षांत पहिल्यांदाच फुलावर आले. बांबूचे बी ग्रामस्थांनी गोळा केले. २०० रुपये किलो दराने ते भुलोरी ग्रामपंचायतने विकत घेतले. ग्रामपंचायतने हे बी ३०० रुपये किलोने विकले. राज्यातच नव्हे, तर मध्य प्रदेश वनविभागानेही हे बी विकत नेले. यात ग्रामपंचायतीला २३ लाख मिळालेत. मेळघाट वनक्षेत्रातही या बांबू बियांचा वापर केला गेला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती