शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव विभागाने जंगलात सोडले दीड कोटी ‘सीड बॉल’, बांबूचे बी रुजविण्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:22 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत.

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वन्यजीव विभागाने दीड कोटींहून अधिक लाडू जंगलात सोडले आहेत. जंगलात सोडलेले लाडू काळ्या मातीचे असून, त्यात बांबू बी टाकले आहे. मनुष्यबळाचा वापर करून हे खास ‘सीड बॉल’ वन्यजीव विभागाने बांधून घेतले. या मातीच्या लाडवातून बांबूचे बी वनक्षेत्रात रुजविण्याचा मेळघाटच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. या मातीच्या लाडवाच्या माध्यमातून जंगलात बांबूची लागवड करण्याचा, जंगलाची घनता वाढविण्याचा, जंगलातील अवघड ठिकाणांसह जंगलात जिथे बांबू नाही, त्या ठिकाणी ते रुजविण्याचा प्रयत्न झाला आहे.

आकोट वन्यजीव विभागात सर्वत्र, गुगामल वन्यजीव विभागातील हरिसाल, तारूबांदा, वैराट तसेच सिपना वन्यजीव विभागात सेमाडोह पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात हे लाडू मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहेत. यात वन्यजीव क्षेत्रातील मानवी वापर कमी करीत कुठलेही खड्डे किंवा खोदकाम न करता बांबू रोपांची लागवड झाली आहे. नर्सरीत बांबू रोप तयार करून त्या पॉलीथीन बॅगमधील बांबू रोपांची जंगल क्षेत्रात नेण्यापर्यंतचा होणारा खर्च टाळण्यात वन्यजीव विभागाला यश आले आहे.

चिकण मातीचे लाडू बांधण्यात चिखलदरा फॉरेस्ट ट्रेनिंग स्कुलच्या प्रशिक्षणार्थींसह गावपातळीवरील वनसमितीचाही सहभाग उल्लेखनीय राहिला. पहिल्या पावसातच हे लाडू फुटलेत अन् जागीच पसरलेत. या पसरलेल्या मातीत त्या बांबू बिया जागेवरच नैसर्गिक वातावरणात उगवल्यात. यातून बांबूची रोपं जंगलात वाढीस लागली. यात बांबू बियांची उगवण क्षमता अधिक राहली असून जवळपास ९० ते ९५ टक्के लाडवातून बांबूच्या रोपट्यांनी जंगलात पाय रोवले आहेत. जंगलातील गवतासोबतच त्यांनीही जागा मिळवली आहे. 

बांबू बियांनी लक्षावधी दिले कमवूनमेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत भवई-भुलोरी जंगल परिसरात ४०४ हेक्टर क्षेत्रातील बांबू १५ ते २० वर्षांत पहिल्यांदाच फुलावर आले. बांबूचे बी ग्रामस्थांनी गोळा केले. २०० रुपये किलो दराने ते भुलोरी ग्रामपंचायतने विकत घेतले. ग्रामपंचायतने हे बी ३०० रुपये किलोने विकले. राज्यातच नव्हे, तर मध्य प्रदेश वनविभागानेही हे बी विकत नेले. यात ग्रामपंचायतीला २३ लाख मिळालेत. मेळघाट वनक्षेत्रातही या बांबू बियांचा वापर केला गेला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती