शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 18:56 IST

पीक नुकसानीमुळे हवालदिल : मदतीला विलंब, लालफितशाहीत अडकल्या फाईली

- गणेश वासनिकअमरावती : विदर्भात हरीण, नीलगाय, सांबर, चितळ व रानडुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, जंगलात हिरवळ, चारा, पाणी नसल्याने या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये वळविला आहे. हे वन्यप्राणी शेती पिके बेसुमारपणे नष्ट करतात. मात्र,  शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई थातुरमातुर  मिळत आहे.

 अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा व नागपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी दोन वर्षांपासून आपला मोर्चा शेतीकडे वळविला आहे. कळपाने वास्तव्य करणाºया या वन्यप्राण्यांनी शेतीतील गहू, हरभरा, कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांवर हल्ला केलेला आहे. विदर्भातजंगलातील गवत, चारा नष्टप्राय झालेले असून तृष्णा भागविण्यासाठी पाण्याची बिकट अवस्था आहे. परिणामी वन्यजीव जंगलाशेजारच्या शेतीत घुसून पिकांची धुळधान करीत असल्याचे वास्तव आहे. वन्यप्राण्यांच्या या संकटामुळे विदर्भातील शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. सतत चार वर्षांपासून सतत नापिकी आणि यंदा दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच वन्यप्राण्यांच्या हैदासाने यात भर पडली आहे. शेतातील उभे पिक वन्यप्राणी नष्ट करीत असल्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास विदर्भात शेतकºयांच्या विंवचनेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

कुंपनाला वीजप्रवाहवन्यप्राण्यांपासून शेतीतील पिकांचे नुकसान रोखण्याकरिता शेतकरी शेतीच्या कुंपनाला रात्रीच्या सुमारास वीज प्रवाह सोडतात. परिणामी यात वन्यजीवांचा जीव जातो तर शेतकºयास तुरुंगवारी होते. दोन वर्षांत वीज प्रवाहामुळे ३ वाघ, ५ बिबट व इतर वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. उंच कुंपण ओलांडून वन्यप्राणी शेतात शिरतात अन् पिके फस्त करतात. 

पीक नुकसानीची मदत अपुरीरात्रीतून वन्यजीव कमी अधिक प्रमाणात ५ ते ७ हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी करतात. अशावेळी प्रसिद्ध समिती शेतकºयांच्या शेती पीकनुकसानीचा अहवाल तयार करतात. मात्र, शेतकºयांना शेत पीक नुकसानीच्या केवळ ४० टक्के मदत वनविभाग देते. ही मदत एक वर्षानंतर शेतकºयांना मिळत असल्याने शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे. हेक्टर होणाºया नुकसानीच्या तुलनेत टप्पा-टप्प्याच्या नुकसानीचे गणित काढून शेतकºयास प्रतिएकर ५ ते ७ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. परंतु, त्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागते.

निधीचा अभाव शेती पीक नुकसानीचे विदर्भात १० हजारांच्यावर प्रकरणे वनविभागाकडे आलेली असून निधीचा वानवा असल्याने शेतकºयांना गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक मदत देण्यात आली नाही. शेत पिक नुकसानीचे प्रकरणे वाढीस लागलेली असताना निधी मिळत नसल्याने शेतकरी संकटात आलेला आहे. परिणामी विदर्भातील वन्यजीवसुद्धा धोक्यात आलेले आहे. कारण निलगायी, हरिण, चितळ, चिंगारा, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या जंगल नसलेल्या भागात दुपटीने वाढ झालेली आहे. 

 

वन्यप्राण्यांनी शेती पिकाचे नुकसान केल्यास त्याची नुकसान भरपाईसाठी नियमावली ठरली आहे. त्यानुसारच वनविभाग कार्यवाही करते. नुकसान भरपाईची काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्याचा मागोवा घेत संबंधित शेतकºयांना न्याय दिला जाईल.  - गजेंद्र नरवणे,   उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :Vidarbhaविदर्भforestजंगल