शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 18:56 IST

पीक नुकसानीमुळे हवालदिल : मदतीला विलंब, लालफितशाहीत अडकल्या फाईली

- गणेश वासनिकअमरावती : विदर्भात हरीण, नीलगाय, सांबर, चितळ व रानडुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, जंगलात हिरवळ, चारा, पाणी नसल्याने या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये वळविला आहे. हे वन्यप्राणी शेती पिके बेसुमारपणे नष्ट करतात. मात्र,  शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई थातुरमातुर  मिळत आहे.

 अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा व नागपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी दोन वर्षांपासून आपला मोर्चा शेतीकडे वळविला आहे. कळपाने वास्तव्य करणाºया या वन्यप्राण्यांनी शेतीतील गहू, हरभरा, कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांवर हल्ला केलेला आहे. विदर्भातजंगलातील गवत, चारा नष्टप्राय झालेले असून तृष्णा भागविण्यासाठी पाण्याची बिकट अवस्था आहे. परिणामी वन्यजीव जंगलाशेजारच्या शेतीत घुसून पिकांची धुळधान करीत असल्याचे वास्तव आहे. वन्यप्राण्यांच्या या संकटामुळे विदर्भातील शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. सतत चार वर्षांपासून सतत नापिकी आणि यंदा दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच वन्यप्राण्यांच्या हैदासाने यात भर पडली आहे. शेतातील उभे पिक वन्यप्राणी नष्ट करीत असल्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास विदर्भात शेतकºयांच्या विंवचनेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

कुंपनाला वीजप्रवाहवन्यप्राण्यांपासून शेतीतील पिकांचे नुकसान रोखण्याकरिता शेतकरी शेतीच्या कुंपनाला रात्रीच्या सुमारास वीज प्रवाह सोडतात. परिणामी यात वन्यजीवांचा जीव जातो तर शेतकºयास तुरुंगवारी होते. दोन वर्षांत वीज प्रवाहामुळे ३ वाघ, ५ बिबट व इतर वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. उंच कुंपण ओलांडून वन्यप्राणी शेतात शिरतात अन् पिके फस्त करतात. 

पीक नुकसानीची मदत अपुरीरात्रीतून वन्यजीव कमी अधिक प्रमाणात ५ ते ७ हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी करतात. अशावेळी प्रसिद्ध समिती शेतकºयांच्या शेती पीकनुकसानीचा अहवाल तयार करतात. मात्र, शेतकºयांना शेत पीक नुकसानीच्या केवळ ४० टक्के मदत वनविभाग देते. ही मदत एक वर्षानंतर शेतकºयांना मिळत असल्याने शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे. हेक्टर होणाºया नुकसानीच्या तुलनेत टप्पा-टप्प्याच्या नुकसानीचे गणित काढून शेतकºयास प्रतिएकर ५ ते ७ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. परंतु, त्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागते.

निधीचा अभाव शेती पीक नुकसानीचे विदर्भात १० हजारांच्यावर प्रकरणे वनविभागाकडे आलेली असून निधीचा वानवा असल्याने शेतकºयांना गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक मदत देण्यात आली नाही. शेत पिक नुकसानीचे प्रकरणे वाढीस लागलेली असताना निधी मिळत नसल्याने शेतकरी संकटात आलेला आहे. परिणामी विदर्भातील वन्यजीवसुद्धा धोक्यात आलेले आहे. कारण निलगायी, हरिण, चितळ, चिंगारा, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या जंगल नसलेल्या भागात दुपटीने वाढ झालेली आहे. 

 

वन्यप्राण्यांनी शेती पिकाचे नुकसान केल्यास त्याची नुकसान भरपाईसाठी नियमावली ठरली आहे. त्यानुसारच वनविभाग कार्यवाही करते. नुकसान भरपाईची काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्याचा मागोवा घेत संबंधित शेतकºयांना न्याय दिला जाईल.  - गजेंद्र नरवणे,   उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :Vidarbhaविदर्भforestजंगल