शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची थट्टा होत असताना पालकमंत्री गप्प का? - यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 12:33 IST

आमदार ॲड. यशोमती ठाकूर पीक विम्याच्या मुद्यावर भडकल्या

अमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांची शासनाने थट्टा चालवली आहे. पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या मुद्यावरून विदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे. असे असताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गप्प का, असा सवाल काँग्रेस आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

अमरावती येथे पीकविम्याच्या मुद्यावर ‘सरकारनामा’शी गुरुवारी त्यांनी संवाद साधला. विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये शासन भेद करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मस्करी करणे लावली आहे. आपण या मुद्यावर विधिमंडळात आवाज उठविणार आहोत. त्यासाठी आधीच आपण प्रश्न दाखल केलाय. बीड जिल्ह्यामध्ये पीकविमा कंपनी २४१ कोटी रुपये देत आहे. बीडमध्ये शेतकरी राहतात, मग अमरावती जिल्ह्यात काय जनावरे राहतात काय, असा संतप्त सवालही आमदार ॲड. ठाकूर यांनी केला. अमरावती जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांसाठी फक्त आठ लाख देण्यात आले आहेत, असे त्या म्हणाल्या.

पीक विम्याची ही रक्कम देत असताना अमरावतीचे पालकमंत्री आता गप्प का आहेत असे नमूद करीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. शासन शेतकऱ्यांच्या मुद्यावर अजिबात गंभीर नाही. शासनाने शेतकऱ्यांना गृहीत धरणे बंद न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भातील शेतकरी वेगळा, मराठवाड्यातील वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळा असा भेद आतापर्यंत कुणीही केला नव्हता. परंतु, सध्याचं शासन असा भेद करताना दिसतेय, असा आरोपही ॲड. आमदार ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणYashomati Thakurयशोमती ठाकूरFarmerशेतकरीchandrakant patilचंद्रकांत पाटील